Post views: counter

Current Affairs December 2016 Part 5


#eMPSCkatta_Current_Affairs

🔹अशोकस्तंभाचे चित्रकार दीनानाथ भार्गव यांचे निधन

राष्ट्रीय चिन्ह अशोकस्तंभाचे स्केच करणाऱ्या टीमचे सदस्य दीनानाथ भार्गव यांचे आज इंदुरमध्ये वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. भारतीय संविधानाच्या पांडुलिपीची पानेही भार्गव यांनी तयार केली होती. त्यांनी गेली १० वर्षे हृदयविकाराचा त्रास होता. त्यांच्यावर अॅंजिओप्लास्टीदेखील करण्यात आली होती, अशी माहिती त्यांची सून सापेक्षी भार्गव यांनी दिली.

१ नोव्हेंबर १९२७ ला मध्य प्रदेशातल्या बैतुल जिल्ह्यातल्या मुलताई येथे त्यांचा जन्म झाला होता. कला भवन शांती निकेतनचे कला गुरू नंदलाल बोस यांच्या प्रिय शिष्यांपैकी ते एक होते. भारतीय संविधानाच्या पांडुलिपीतल्या पृष्ठाच्या डिझाइनसाठी बोस यांनीच भार्गव यांची निवड केली होती. शांती निकेतनमध्ये ललित कलेत तीन वर्षांच्या पदविकेचा अभ्यास करत असताना भार्गव यांची निवड या डिझाइन टीममध्ये झाली होती, असे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹सिंधुदुर्गात शिवरायांचे वास्तुसंग्रहालय सुरू होणार

शिछत्रपतींच्या जीवनावर आधारित ऐतिहासिक वास्तुसंग्रहालय सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात सुकळवाड येथे मातोश्री कला-क्रीडा मंडळाच्या वतीने उभारण्यात येत आहे. या वास्तुसंग्रहालयाचे पहिले दालन नवीन वर्षांत जानेवारी महिन्यात सुरू करण्यात येत आहे. हे देशातील पहिले वास्तुसंग्रहालय ठरेल, असा विश्वास शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केला. मालवण तालुक्यातील सुकळवाड येथे एक कोटी रुपये

Current Affairs December 2016 Part 4


#eMPSCkatta_Current_Affairs

🔹India vs England: चेन्नईत इंग्लंडला ‘नायर’ वादळाचा तडाखा, करुण नायरची त्रिशतकी खेळी

चेन्नईत इंग्लंडला ‘नायर’ वादळाचा तडाखा बसला. करुण नायर या कर्नाटकच्या युवा खेळाडूने इंग्लंडच्या गोलंदाजांच्या चिंधड्या उडवत कसोटी कारकिर्दीतील आपले पहिलेवहिले त्रिशतक झळकावले आहे. नायरच्या अफलातून खेळीच्या जोरावर भारतीय संघाला इंग्लंडसमोर ७ बाद ७५९ धावांचा डोंगर उभारता आला. भारतीय संघाची एका डावातील ही सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. भारतीय संघाकडे २८२ धावांची भक्कम आघाडी आहे. विशेष म्हणजे, आपल्या तिसऱयाच आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यात शतक ठोकून त्रिशतकापर्यंत मजल मारणारा करुण नायर हा पहिलाच भारतीय फलंदाज ठरला आहे. करुण नायर याने ३२ चौकार आणि ४ खणखणीत षटकारांच्या जोरावर केवळ ३८३ चेंडूत नाबाद ३०३ धावांची खेळी साकारली. नायरचे त्रिशतक पूर्ण झाल्यानंतर भारताने आपला डाव ७५९ धावांवर घोषित केला. त्यानंतर आजचा दिवसाचा खेळ संपण्यासाठी शिल्लक असलेल्या पाच षटकांमध्ये इंग्लंडला बिनबाद १२ धावा करता आल्या आहेत.

करुण नायरने आज दिवसाच्या सुरूवातीपासूनच आश्वसक खेळी केली. कारकिर्दीतील पहिलेवहिले शतक गाठल्यानंतर उपहारानंतरही त्याने इंग्लंडच्या गोलंदाजांना कोणतीही संधी न देता मैदानात टीच्चून फलंदाजी केली.

 अश्विन, मुरली विजय आणि जडेजा यांनी नायरला साजेशी साथ देत भारताच्या धावसंख्येला आकार दिला. मुरली विजयने सुरूवातीला करुण नायरला चांगली साथ दिली पण नायरचे शतक झाल्यानंतरच्या पुढच्याच षटकात मुरली विजय डॉसनच्या फिरकीवर पायचीत होऊन माघारी परतला. मुरली विजयने यावेळी फक्त २९ धावांचे योगदान देऊ शकला. तिसऱया सत्रात करुण नायरने २५० धावांचा पल्ला गाठल्यानंतर आपल्या पोतडीतील अनोख्या आणि जोरकस फटक्यांचा नजराणा पेश करून उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले.

तत्पूर्वी, तिसऱ्या दिवसअखेर भारताने ४ बाद ३९३ अशी मजल मारली होती. कसोटीच्या तिसऱया दिवशी केएल राहुल याने आपल्या सर्वोत्तम कामगिरीचा नजराणा पेश करत १९९ धावांची खेळी साकारून संघाला मोलाचे योगदान दिले. तर करुण नायर याने तिसऱया दिवसाच्या अखेरीस नाबाद ७१ धावा केल्या होत्या. भारताच्या सलामीजोडीने आजच्या दिवसाची सुरवात देखील चांगली केली होती. पार्थिव पटेल आणि केएल राहुल यांनी शतकी भागीदारी पूर्ण करून संघाला मजबूत धावसंख्या उभारून दिली.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹व्यावसायिक हित जोपासल्याप्रकरणी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख ख्रिस्तीना लेगार्ड दोषी

फ्रान्सच्या अर्थमंत्री असताना एका व्यावसायिकाचे आर्थिक हित जोपासल्याबद्दल आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख ख्रिस्तीना लेगार्ड यांना फ्रान्सनमधील न्यायालयाने दोषी ठरवले आहे. मात्र याप्रकरणात लेगार्ड यांना कोणतीही शिक्षा सुनावण्यात

Current Affairs December 2016 Part 3


#eMPSCkatta_Current_Affairs

🔹पॅरिसमध्ये गेल्या दहा वर्षांतील सर्वाधिक प्रदूषण

पॅरिस शहर दहा वर्षांतील सर्वांत मोठ्या प्रदूषणाचा सामना करीत आहे. वाढत्या प्रदूषणामुळे शहरात निम्म्या खासगी कारच्या वाहतुकीला शुक्रवारी, सलग तिसऱ्या दिवशीही प्रतिबंध आणण्यात आले.

सम-विषम नंबरनुसार सध्या वाहनांना रस्त्यावर परवानगी देण्यात आली आहे. दुसरीकडे लोकांनी आपली वाहने घराबाहेर काढूच नयेत, असे आवाहन करण्यात आले असून, त्यांना सार्वजनिक वाहनांतून मोफत प्रवासाची मुभा देण्यात आली.

वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर ल्यो शहरातही शनिवारी हीच पद्धत वापरण्यात आली. रोन व्हॅलीसह फ्रान्सच्या प्रमुख शहरांत हा प्रयोग करण्यात येणार आहे.

 पॅरिसमध्ये सम-विषम नंबरनुसार वाहने रस्त्यावर धावत आहेत. पॅरिसच्या उपनगरातही याच पद्धतीने वाहतूक व्यवस्था आहे. पहिल्या दोन दिवसांत अनेक वाहनचालकांनी याला प्रतिसाद दिला नाही. तर, या मुद्यावरून नंतर राजकारणही सुरू झाले. च्पॅरिसचे महापौर ऐनी हिडाल्गो म्हणाले की, परिवहन सेवेतील अडथळे दूर करण्यासाठी असे पाऊल उचलणे हा आमचा विशेषाधिकार आहे. महापौर ऐनी हिडाल्गो हे फ्रान्सचे अध्यक्ष ओलांद यांचे निकटवर्तीय समजले जातात.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹राज्यसभेत अपंग विधेयकाला मंजुरी, खराब वागणूक दिल्यास दोन वर्षांचा तुरुंगवास

अपंग व्यक्तीस भेदभाव करणारी वागणूक दिल्यास दोन वर्षे तुरुंगवास आणि पाच लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. या कायद्याला राज्यसभेनी आज मंजुरी दिली आहे. अपंग व्यक्ती हक्क संरक्षण कायदा, २०१४ ला राज्यसभेकडून मंजुरी मिळाली आहे. अपंग व्यक्तीला संरक्षण मिळावे आणि त्याला योग्य प्रमाणात संधी मिळाव्या यासाठी हा कायदा आहे. राज्यसभेत हा कायदा एकमताने मंजूर झाला.

संयुक्त राष्ट्राच्या अपंग व्यक्ती आणि त्या संदर्भातील मुद्दे या समितीने ज्या तरतुदी सुचवल्या होत्या त्यांचा समावेश या विधेयकात करण्यात आला होता. सामाजिक कल्याण मंत्री थावर चंद गेहलोत यांनी हे विधेयक राज्यसभेत सादर केले होते. जेव्हा राज्यसभेचे कामकाज सुरू झाले होते त्यावेळी राज्यसभेचे विरोधी पक्षनेते गुलाम नबी आजाद, बसपच्या प्रमुख मायावती, सीपीआयचे नेते सीताराम येचुरी यांनी या विधेयकाला त्वरित मंजुरी मिळावी

Current Affairs December 2016 Part 2


#eMPSCkatta_Current_Affairs

🔹उपेक्षित नोबेल विजेत्याचा पाक पुन्हा सन्मान करणार

इस्लामाबाद - सुमारे 36 वर्षांपूर्वी ज्या व्यक्तीने पाकिस्तानला पहिले नोबेल मिळवून दिले आणि आजतागायत पाकिस्तान त्या उपेक्षित व्यक्तीचा तिरस्कार करत होता , त्या व्यक्तीचा पाकिस्तान आता सन्मान करणार आहे .

पाकिस्तानमधील कायदे ए आझम विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाला भौतिकशास्त्रज्ञ नोबेल पुरस्कार विजेते प्रोफेसर दिवंगत अब्दुस सलाम यांचे नाव देण्याची योजना तयार केली जात आहे . गेल्या तीन दशकांपासून पाकिस्तान या शास्त्रज्ञाच्या योगदानाकडे दुर्लक्ष करत होते कारण ते अहमदी समाजातील होते. पाकिस्तानच्या कायद्यानुसार अहमदी नागरिकांना स्वत : ला मुसलमान म्हणण्याचा अधिकार नाही. सलाम हे केवळ पहिले पाकिस्तानी नाही तर नोबेल जिंकणारे ते पहिले मुस्लिम होते. मात्र , अहमदिया मुसलमान असल्याने पाकिस्तान त्यांना मुस्लिम मानत नव्हते . मात्र , पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या कार्यालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले , की इस्लामाबादच्या कायदे ए आझम विद्यापीठाच्या नॅशनल सेंटर फॉर फिजिक्स या विभागाला सलाम यांचे नाव देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे . पंतप्रधानांनी शिक्षण मंत्रालयालादेखील औपचारिक प्रस्ताव करण्याचे निर्देश दिले असून , जेणेकरून पाकिस्तानच्या अध्यक्षांची परवानगी घेतली जाईल .

अब्दुस सलाम यांना नोबेल
अब्दुस सलाम यांना 1979 मध्ये शेल्डन ग्लाशो आणि स्टिव्हन वाइनबर्ग यांच्यासह संयुक्तपणे भौतिकशास्त्रातील नोबेल देण्यात आले होते . देवकण शोधण्याचा मार्ग त्यांनी शोधून काढला होता आणि हा शोध शंभर वर्षांतील सर्वांत मोठे यश मानले जात होते . मात्र , पाकिस्तानने आजपर्यंत या संशोधनाची कधीही कदर केली नाही . एवढेच नाही तर पाकिस्तानातील कट्टरपंथीयाच्या दबावामुळे नोबेलविजेते असूनही आपल्या कार्यकाळात त्यांना विद्यापीठात अध्यापनाचे कार्यदेखील करू दिले नाही . 1974 मध्ये एका कायदा करून अहमदियांना मुस्लिमेतर म्हणून जाहीर केले होते . 1984 साली पुन्हा एकदा कायदा तयार करण्यात आला आणि त्यानुसार जर एखादा अहमदी स्वत : ला मुस्लिम म्हणत असेल तर त्याला तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते . त्यामुळे अब्दुस यांचा शोध आयुष्यभर पाकिस्तानात दुर्लक्षित राहिला .

 पाकिस्तानातील रबाव शहरात अब्दुस सलाम यांना दफन केलेले आहे . या शहरात अहमदी नागरिकांची संख्या लक्षणीय आहे . त्यांच्या कबरीवर नोबेल जिंकणारे पहिले मुसलमान असा उल्लेख करण्यात आला होता ; परंतु अधिकाऱ्यांनी मुसलमान हा शब्द खोडून काढला.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹इस्रोच्या 'रिसोर्ससॅट-२ए' चे यशस्वी प्रक्षेपण

भारतीय अवकाश संशोधन संस्था - इस्रोने आज सतीश धवन अवकाश केंद्रातून रिमोट सेंसिंग उपग्रह रिसोर्ससॅट-२ए चे यशस्वी प्रक्षेपण केले. सकाळी १०.२४ वाजता पीएसएलव्ही-सी३६ च्या मदतीने इस्रोने हा उपग्रह अंतराळात सोडला. हा रिसोर्ससॅट-१ आणि २ च्या

Current Affairs December 2016 Part 1


#eMPSCkatta_Current_Affairs

🔹‘ ओबीसीं ’मध्ये १५ जातींचा समावेश

नवी दिल्ली - केंद्रीय ओबीसी यादीमध्ये महाराष्ट्रासह आठ राज्यांमधील १५ नव्या जातींचा समावेश करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने आज घेतला . त्याचबरोबर मुंबई वाहतूक प्रकल्पाच्या ( एमयूटीपी ) तिसऱ्या टप्प्यालाही मंजुरी देण्यात आली . याशिवाय पाकव्याप्त काश्मीरमधील निर्वासितांसाठी केंद्र सरकारने आज दोन हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले . पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ बैठकीत हे निर्णय झाले .

राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाने ( एनसीबीसी ) केलेल्या शिफारशीनुसार केंद्रीय ओबीसी यादीमध्ये समावेशांसाठी २४७९ जातींबद्दलची अधिसूचना केंद्र सरकारने सप्टेंबरमध्ये केली होती . यामध्ये नामसाधर्म्य असलेल्या जाती , उपजातीदेखील आहेत. परंतु , यादरम्यान महाराष्ट्रासोबतच आसाम, बिहार , हिमाचल प्रदेश , झारखंड , मध्य प्रदेश , जम्मू आणि काश्मीर तसेच उत्तराखंड या राज्यांकडून जवळपास २८ बदल करण्याची मागणी झाली . या यादीमध्ये १५ नव्या जाती , नऊ नामसाधर्म्य असलेल्या जाती , उपजाती आणि चार दुरुस्त्यांचा समावेश आहे . केंद्राच्या सुधारित अधिसूचनेनंतर या जातींना शिष्यवृत्ती त्याचप्रमाणे सरकारी नोकऱ्या , शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षणाचे लाभ मिळतील.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹‘एमयूटीपी ’ साठी दहा हजार कोटी

महाराष्ट्रातील मुंबईसह ठाणे , पालघर, आणि रायगड या चार जिल्ह्यांना लाभ पोचविणाऱ्या मुंबई शहरी वाहतूक प्रकल्पाच्या ( एमयूटीपी ) तिसऱ्या टप्प्याला केंद्रीय मंडळाने मान्यता दिली आहे . मुंबईतील वाहतुकीसाठी महत्त्वाचा असलेला ‘एमयूटीपी टप्पा ३ ’ येत्या पाच वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित असून त्यासाठी अंदाजे १० ,९४७ कोटी रुपये खर्च येऊ शकतो. याअंतर्गत पश्चिम रेल्वेच्या विरार -डहाणू रोड यादरम्यान अतिरिक्त दुहेरी मार्ग तयार करण्याच्या प्रस्तावाला होकार मिळाला आहे . यामुळे चर्चगेट ते डहाणू रोड उपनगरीय रेल्वे वाहतूक सेवेचा विस्तार होणार आहे . पश्चिम रेल्वेचा सर्वाधिक वर्दळीचा विरार ते डहाणू दरम्यानचा मार्ग मुंबई -अहमदाबाद व दिल्ली या प्रमुख रेल्वे मार्गाचा हिस्सा आहे .

याशिवाय , पनवेल- कर्जत या मार्गाच्या दुहेरीकरणाचीही यात तरतूद आहे . यामुळे पनवेल मार्गे कर्जत ते छत्रपती शिवाजी टर्मिनस ( सीएसटीएम ) हा मार्ग सुरू होणार आहे . कल्याण मार्गे कर्जत ते छत्रपती शिवाजी टर्मिनस या विद्यमान मार्गापेक्षा हे अंतर २३ किलोमीटरने कमी होणार असून , धीम्या लोकलचा प्रवास ३५ ते ४० मिनिटांनी कमी होईल . कल्याणहून वाशी किंवा पनवेल ला जाणाऱ्या प्रवाशांना ठाण्याला उतरून हार्बर लाइनने उलटा प्रवास करावा लागतो . परिणामी ठाणे स्थानकावर प्रवाशांची गर्दी असते . ऐरोली -कळवा कॉरिडॉरमुळे प्रवाशांना ठाण्याला उतरण्याची गरज भासणार नाही .

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹ज्येष्ठ समाजसेविका सुलभा ब्रह्मे यांचं निधन

जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, थोर विदुषी व अर्थतज्ज्ञ प्रा. सुलभा ब्रह्मे यांचं आज पुण्यातील राहत्या घरी निधन झालं. त्या ९० वर्षांच्या होत्या. पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांच्या त्या भगिनी होत.