आपण आज उपभोगत असलेले स्वातंत्र्य आपल्या पर्यंत पोहचवण्यासाठी अनेक ज्ञात अज्ञात व्यक्तींनी अनेक कष्ट उपसले आहेत. काहींनी वैभवाचा त्याग करून सामान्य जीवन पत्करून देशसेवा केली तर काहींनी तर आपले जीवनच देशाला समर्पित केले. अशा अनेक महान व्यक्तींविषयी आपण आज जाणून घेऊ आणि या स्वतंत्र भारतात आपल्याला मोकळा श्वास घेऊ देण्यासाठी त्यांनी केलेल्या त्यागाची आठवण जगवूया...
Indian Leaders |
- राजाराम मोहन रॉय – एखाद्या देशाला फक्त राजकियच नाही तर सामाजिक, आर्थिक व मानसिक स्वातंत्र्यही आवश्यक असते व त्याच सामाजिक स्वातंत्र्याचे भारतीय उद्गाते होते राजाराम मोहन रॉय. ब्राम्हो समाजाची स्थापना करून पारंपारिक अनिष्ट रूढींना जोरदार विरोध, सतीबंदीची मागनी करणारी चळवळ, शिक्षणाचे महत्व प्रतिपादीत करणे इ. प्रमुख कार्ये करूण त्यानी समाजसुधारकांच्या महान परंपरेचा भारतात श्रीगणेशा केला.
- महात्मा फुले – भारतीय स्त्री शिक्षणाचे उद्गाते, दलित व इतर मागासलेल्या जातींच्या शिक्षणाची सुरूवात करणारी पहिली व्यक्ती, विधवा ब्राम्हण स्त्रीया व त्यांच्या अनैतिक संबंधातुन झालेल्या मुलांना