Post views: counter

इतिहासाच्या अभ्यासामागचा दृष्टिकोन

                      केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसंदर्भातील पहिले आव्हान म्हणजे 'अभ्यासक्रमाचे योग्य आकलन'. मुख्य परीक्षेच्या सामान्य अध्ययन पेपर १मधील 'इतिहास' या घटकाचा आपण साकल्याने विचार करू. अभ्यासक्रम आणि आवश्यक संदर्भग्रंथ यापलीकडे जाऊन या घटकासाठी आवश्यक दृष्टिकोन कसा विकसित करता   येईल, या विषयी चर्चा करूया.
                        प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक भारतीय संस्कृती (कला, साहित्य व वास्तुकला), आधुनिक भारताचा इतिहास, भारतीय स्वातंत्र्याची चळवळ, स्वातंत्र्योत्तर भारताची पुनर्रचना व दृढीकरण आणि आधुनिक जगाचा इतिहास या उपघटकांचा समावेश इतिहास या घटकामध्ये होतो. या उपघटकांची अपेक्षित व्याप्ती व खोली ठरविणे हे अभ्यासक्रमाच्या आकलनासंदर्भातील मुख्य आव्हान ठरते.

                     NCERT च्या क्रमिक पुस्तकांचे ज्ञानाधिष्ठित अध्ययन हा तयारीचा पहिला व महत्त्वाचा टप्पा ठरतो. इतिहासाच्या पुस्तकांबरोबरच इतर विषयांच्या पुस्तकांचे अध्ययन करणे आवश्यक आहे. इतिहास म्हणजे मानवजातीच्या जीवनप्रवाहाचा अभ्यास! हा प्रवाह अनेक अंगांनी युक्त असा असतो. कारण जीवनाची विभागणी विषयानुसार करता येत नाही; तो प्रवाह समग्र असतो आणि म्हणूनच त्याचा अभ्यासदेखील समग्रपणेच करावा लागतो.
                       इतिहासाच्या कोणत्याही कालखंडाचा अभ्यास म्हणजे त्या कालखंडाच्या राजकीय, सामाजिक, आíथक, प्रशासकीय, सांस्कृतिक, धार्मिक बाजूंचा अभ्यास. तद्वतच त्यांचा एकमेकांशी असलेला संबंध आणि परिणाम यांचा अभ्यास याचाही अंतर्भाव होतो. म्हणूनच या विषयाच्या संपूर्ण आकलनासाठी इतर विषयांच्या मूलभूत संकल्पनांचे आकलन अत्यावश्यक आहे. राज्यशास्त्र, समाजशास्त्र व अर्थशास्त्र या विषयांचा NCERT च्या पुस्तकांमधून केलेला अभ्यास महत्त्वाचा ठरतो.
                        प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक भारतीय संस्कृती या घटकाचा अभ्यास म्हणजे केवळ संस्कृतीचा थेट अभ्यास (हा अभ्यास नसतोच मुळात! हा ठरतो केवळ माहिती संकलित करण्याचा व लक्षात ठेवण्याचा पराकोटीचा प्रयत्न!) असा काहीसा चुकीचा समज आढळतो. २०१३ च्या मुख्य परीक्षेतील संगम साहित्यावरील प्रश्न त्यामधील तत्कालीन आíथक व सामाजिक परिस्थितीचे चित्रण यावर भाष्य करण्यास प्रवृत्त करतो तर मंदिर वास्तुकलेवरील प्रश्न उत्तरामध्ये चोलांच्या काळात उच्चत्तम पातळी गाठणाऱ्या मंदिर वास्तुकलेच्या उत्क्रांतीच्या चच्रेची अपेक्षा करतो. यावरून एक बाब स्पष्ट होते ती म्हणजे, या अपघटकावरील प्रश्न केवळ संस्कृतीशी प्रत्यक्ष निगडित राहतीलच असे गृहीत धरता येत नाही. किंबहुना संस्कृतीच्या अनुषंगाने इतर अंगांचा वेध घेता येणं अपेक्षित आहे. अर्थात ही बाब नसíगककरीत्या ओघानेच येते. परंतु विषयांमध्ये विभाजित ज्ञानाचा 'परंपरागत पद्धतशीर अभ्यास' यावर आधारित शिक्षणपद्धतीच्या सवयीमुळे बहुशाखीय दृष्टिकोन नव्याने निर्मित करण्याचा अट्टहास आज करावा लागतोय. संस्कृतीची निर्मिती, जडणघडण ही मानवी जीवनाच्या प्रवाहातच अंतर्भूत असते. त्याच प्रवाहाचा ती अविभाज्य भाग असते. विभाजन (विषयांमधील) हे केवळ अभ्यासाच्या सोयीसाठी आहे याचा विसर पडणे धोकादायक ठरते. मुळातच संस्कृती ही सामाजिक, आíथक, राजकीय, धार्मिक घटकांच्या गतिमान बदलांची अभिव्यक्ती असते. एखाद्या कालखंडातील अशा प्रकारची निर्मित सांस्कृतिक अभिव्यक्ती सामाजिक, आíथक, राजकीय, धार्मिक अभिव्यक्तींवर परिणाम करते, त्याला आकार देते.
                      हा अन्योन्य संबंध लक्षात न घेता केलेला संस्कृतीचा अभ्यास एकांगी तर ठरतोच, तद्वतच त्याचे
पर्यवसान माहिती तात्पुरती साठवण्यासाठीच्या घोकंपट्टीमध्ये होते. कोणत्याही कालखंडातील सामाजिक, आíथक, राजकीय, धार्मिक घटकांचा 'आवश्यक' तेवढा अभ्यास हा संस्कृतीच्या आकलनाची ताíकक पूर्तता करतो. म्हणूनच प्राचीन व मध्ययुगीन इतिहासाच्या इतर घटकांचा 'आवश्यक किमान' अभ्यास व संस्कृतीचा सखोल अभ्यास असा दृष्टिकोन असावा.

                   आधुनिक भारताचा इतिहास व भारतीय स्वातंत्र्याची चळवळ यांचासुद्धा ताíकक अभ्यास करणे सोपे व सोयीचे ठरते. हा सुद्धा एक ताíकक उत्क्रांतीचा प्रवास ठरतो. मुघल साम्राज्याच्या ऱ्हासातून निर्मित राजकीय अस्थर्याच्या पाश्र्वभूमीतून उगम पावणारी ब्रिटिश सत्ता, कंपनीचा काळ, कंपनीच्या कारभारातून निर्माण झालेल्या असंतोषाची १८५७ च्या उठावात झालेली अभिव्यक्ती, १८५७ च्या उठावातून पुढे येणारी सर्व भारतीय एक असल्याची राष्ट्रीयत्वाची नवजात संकल्पना, याच राष्ट्रीयत्वाची पुढील काळातील वाढ व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेतून (१८८५) झालेली राष्ट्रीयत्वाची प्रत्यक्ष व औपचारिक अभिव्यक्ती, त्यावर आधारित राष्ट्राच्या स्वातंत्र्याची चळवळ असा हा उत्क्रांत होत जाणारा प्रवास आहे. या मुख्य धाग्याव्यतिरिक्त इतर अनेक धागे व त्यांची उत्क्रांती याचा सखोल अभ्यास करणे अपेक्षित आहे. सामाजिक व धार्मिक सुधारणेच्या चळवळी, शैक्षणिक धोरण, प्रसारमाध्यमे, शेतकऱ्यांचे उठाव, कामगारांच्या चळवळी, स्त्री-हक्कांविषयक चळवळी इत्यादींचा यात समावेश होतो.
                     नव्याने स्वतंत्र झालेल्या भारतासमोर अस्तित्व टिकविण्यापासून अनेक आव्हाने होती. फाळणीमुळे झालेली िहसा व निर्वासितांचे लोंढे, भारतीय संस्थानिकांच्या विलीनीकरणाचा प्रश्न, प्रांतिक पुनर्रचनेचा प्रश्न, राष्ट्रांतर्गत प्रादेशिक राष्ट्रवादाचे आव्हान, भुकेचे, दारिद्रय़ाचे, बेरोजगारीचे, शिक्षणाच्या अभावाचे प्रश्न, मागासलेल्या किंबहुना वसाहतवादाच्या जोखडाखाली उद्ध्वस्त झालेल्या अर्थव्यवस्थेची समस्या अशी अनेक आव्हाने होती. या प्रश्नांच्या, समस्यांच्या, आव्हानांच्या सोडवणुकीसाठी/पूर्ततेसाठी अवलंबलेल्या धोरणांचा व त्या धोरणांच्या यशापयशाचा अभ्यास, अपयशातून उगम पावणाऱ्या नवसामाजिक चळवळींचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. भारताच्या आíथक, परराष्ट्र, औद्योगिक व विज्ञानविषयक धोरणांचा यात समावेश होतो. याव्यतिरिक्त स्वातंत्र्योत्तर काळातील महत्त्वाच्या घटनांचा अभ्यास अपेक्षित आहे.
                       आधुनिक जगाच्या इतिहासामध्ये औद्योगिक क्रांती, वसाहतीकरण, वसाहतींसाठीची तीव्र स्पर्धा, पहिले जागतिक महायुद्ध, दोन जागतिक महायुद्धांमधील काळ, दुसरे जागतिक महायुद्ध, निर्वसाहतीकरण, शीतयुद्ध, शीतयुद्धोत्तर जग यांचा समावेश होतो. या घटकांचा अभ्यास सर्व अंगांनी करणे आवश्यक ठरते. 'अमेरिकन क्रांती' हा व्यापारवादाविरुद्धचा आíथक उठाव होता. 'अर्थ विस्तार करा' असा प्रश्न २०१३ च्या मुख्य परीक्षेत विचारला गेला. अमेरिकन क्रांतीच्या कार्यकारणभावाचा वेध घेणारा हा प्रश्न ठरतो. याच्या अभ्यासाला अर्थकारणाची जोड देणे आवश्यक ठरते.
                       वरील सर्व उपघटक व त्यावरील विचारलेल्या प्रश्नांच्या स्वरूपाचा अभ्यास केल्यास एक महत्त्वाची बाब निदर्शनास येते. ती म्हणजे एखाद्या घटनेकडे, व्यक्तीकडे, समस्येकडे, तुटकपणे पाहण्यापेक्षा त्याच्या सामाजिक, आíथक, राजकीय, सांस्कृतिक पाश्र्वभूमी व संदर्भासहित पाहणे, अभ्यासणे क्रमप्राप्त ठरते. अशी प्रक्रिया कठीण किंवा क्लिष्ट असल्याचा गरसमज अनेकांना असतो. पाश्र्वभूमी व संदर्भाविना केलेला अभ्यास हा अभ्यास नसून तो केवळ माहिती साठविण्याचा प्रयत्न असतो. कोणत्याही विषयाचे वाचन हे इतर विषयातील संकल्पनांचे आकलन व प्रत्यक्ष उपयोजनाशिवाय अपूर्ण असते. म्हणूनच या परीक्षेसाठी सावकाश केलेला सर्वागीण, समग्र अभ्यास अधिक फलदायी ठरतो.

षोउर्चे : Loksatta.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा