India Geography लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
India Geography लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Post views: counter

नदी

प्रमुख भूरूपे - नदी 

 
                          युवावस्था अवस्‍थेत पर्वतीय प्रदेशात नदीचा उगम होतो. पाण्‍यांचे आकारमान कमी असले तरी देखील तीव्र उतारामुळे उर्ध्‍व खनन प्रभावी असते. या अवस्‍थेस पुढील भूरूपांची निर्मिती होते.
१) ‘व्‍ही’ आकाराची दरी
तीव्र उर्ध्‍व खननामुळे तळभागाची खोली वाढून ‘व्‍ही’ आकाराच्‍या दरीची निर्मिती होते.
२) निदरी व घळई
अत्‍यंत तीव्र उताराच्‍या बाजू असलेल्‍या अरूंद दरीस निदरी असे म्‍हणतात. जेव्‍हा या निदरीच्‍या बाजूंचा उतार अत्‍यंत तीव्र व खोली अतयंत जास्‍त असते तेव्‍हा त्‍यास घळई असे संबोधले जाते.
उदा. कोलोरॅडो नदीवरील ग्रँड घळई.

वारा

 प्रमुख भू प्रकार - वारा


                   क्षरण प्रक्रियेत वारा हे अत्‍यंत महत्त्वाचे कारक आहे. वार्‍याचे बहुतांशी कार्य शुष्‍क वाळवंटी प्रदेशात आढळून येते. वार्‍याचे कार्य प्रामुख्‍याने खनन, वहन व संचयन या प्रकारे होते.
                   वार्‍याचे खनन कार्य प्रामुख्‍याने ३ प्रकारे होते. वार्‍यामुळे एखाद्या ठिकाणची रेती थेटपणे उचलून नेण्‍याच्‍या प्रक्रियेस अपवहन असे म्‍हणतात. अपघर्षण क्रियेत वार्‍यासोबत असणारे रेतीचे कण खडकांवर घासले जाऊन खडकांची झीज होते. तर रेतीचे कण एकमेकांवर आदळून विभाजीत होण्‍याच्‍या क्रियेस सन्निघर्षण असे संबोधले जाते. वार्‍याच्‍या खनन कार्याची तीव्रता प्रामुख्‍याने वार्‍याचा वेग, रेतीच्‍या कणांचा आकार, खडकांचे स्‍वरूप व हवामान यावर अवलंबून असते.
Post views: counter

प्रमुख नद्या आणि त्यांचा उगम

भारतातील काही महत्वाच्या नद्या आणि त्यांची उगमस्थाने :

  1. गंगा----------गंगोत्री ( उत्तराखंड )
  2. यमुना----------यमुनोत्री ( उत्तराखंड )
  3. सिंधू------------मानसरोवर (तिबेट )
  4. नर्मदा----------मैकल टेकडया , अमरकंटक ( मध्यप्रदेश )
  5. तापी------------सातपुडा पर्वत , बैतुल (मध्यप्रदेश )
  6. महानदी--------नागरी शहर( छत्तीसगड )
  7. ब्रम्हपुत्रा--------चेमायुंगडुंग( तिबेट )
  8. सतलज---------कैलास पर्वत( तिबेट )
  9. व्यास-----------रोहतंग खिंड ( हिमाचल प्रदेश )
  10. गोदावरी-------त्र्यंबकेश्वर , नाशिक
  11. कृष्णा----------महाबळेश्वर
  12. कावेरी----------ब्रम्हगिरी टेकड्या , कूर्ग ( कर्नाटक )
  13. साबरमती------उदयपूर , अरावली टेकड्या ( राजस्थान )
  14. रावी-----------चंबा ( हिमाचल प्रदेश )
  15. पेन्नर-----------नंदी टेकड्या , चिकबल्लापूर ( कर्नाटक

भारतातील प्रमुख शिखरे


हिमालय पर्वतातील प्रमुख शिखरे

शिखराचे नाव:- उंची (मीटर):- देश
  1. माऊंट एव्हरेस्ट:- 8,850:- नेपाळ
  2. के2 (गॉडविन ऑस्टिन):- 8,611:-भारत
  3. कांचनगंगा:- 8,598:- भारत
  4. धौलगिरी:- 8,172:- नेपाळ
  5.  नंगा पर्वत:- 8,126:- भारत
  6. नंदादेवी:- 7,717:- भारत
  7. राकापोशी:- 7,788:- भारत
  8. त्रिशूल:- 7,140:- भारत
  9. बद्रीनाथ:- 7,138:- भारत
Post views: counter

नद्या व उपनद्या :


१) गोदावरी :-
• उजव्या तिराने :- दारणा, प्रवरा, मुळा, बोरा, सिंदफणा, (बिंदुसरा), कुंडलिका, सरस्वती.
• डाव्या तिराने :- कादवा, शिवना, खाम, खेळणा

२) भीमा नदी :-
• उजव्या तिराने :- भामा, इंद्रायणी, मुळा-मुठा, पवना, वेळ, क-हा, नीरा, माण, बोर.
• डाव्या तिराने :- कुकडी, पुष्पावती, मीना, घोड, भोगावती, बोर

३) कृष्णा नदी :- 
• गोदावरी & कावेरी यादरम्यानची प्रमुख नदी.
• उगम : धोम - महाबळेश्वर.
• उजव्या तिराने :- कोयना, वारणा, पंचगंगा [कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती व सरस्वती (गुप्त)], दुधगंगा, वेदगंगा, घटप्रभा, ताम्रपणी..
• डाव्या तिराने :- येरळा, नंदला, अग्रणी
Post views: counter

काश्मिर : जागतिक गुंता

काश्मिर-केंद्री जागतिक गुंता






                           पूर्वी ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे अमेरिका २०१४ च्या अखेरीला अफगाणिस्तानातून माघारी जाणार असेल, तर तिथपासूनच्या २४ तासांत भारतामध्ये दहशतवादाचा स्फोट होईल. त्याचं दहशतवाद्यांकडून सांगितलं जाणारं कारण आणि केंद्रस्थान सुद्धा, काश्मिर असेल. हे १९८९ मध्ये घडलंय. त्याच्या आधी १० वर्षं अफगाणिस्तानात, आता निवर्तलेल्या सोव्हिएत रशियाचं सैन्य होतं. शीतयुद्धाच्या डावपेचाचा अटळ भाग म्हणून अमेरिकेनं सोव्हिएतविरोधी मुजाहिदीन उचलून धरले, पाकिस्तानद्वारा त्यांना पैसा, प्रशिक्षण, शस्त्रास्त्रं, दारूगोळा पुरवला. (ते सर्व सातत्यानं भारताविरुद्ध सुद्धा वापरलं गेलं.) तालिबानची स्थापना अमेरिकेच्या देखरेखीखाली आणि आधी झिया-उल्- हक् अन् नंतर बेनझीर भुट्टोंच्या सूत्रसंचालनानुसार झाली. झिया-उल्- हक् यांच्या कारकीर्दीपासून (१९७८ पासून) पाकिस्तानचं, ऐतिहासिक- सैद्धांतिक दृष्ट्या, जवळजवळ अपरिहार्य म्हणावं-असं ‘तालिबानीकरण’ही तेव्हापासूनच झालं. मग सोव्हिएत रशियाचा दूरदर्शी पण यथावकाश अपयशी ठरलेला अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यानं अफगाणिस्तानातून सोव्हिएत सैन्य मागे घेण्याचं वेळापत्रक
Post views: counter

गोदावरी नदी

गोदावरी नदी 




  • उगम- त्र्यंबकेश्वर १,६२० मी.
  • मुख- काकिनाडा (बंगालचा उपसागर )
  • लांबी- १,४६५ कि.मी.
  • देश- महाराष्ट्र, कर्नाटक , आंध्रप्रदेश ,मध्य प्रदेश, ओरिसा
  • उपनद्या- इंद्रावती , मंजिरा, बिंदुसरा
  • सरासरी प्रवाह- ३,५०५ मी³ /से
  • पाणलोट क्षेत्र- ३,१९,८१० किमी²
  • धरण- गंगापूर (नाशिक ), नांदूर मधमेश्वर ( नाशिक ), डौलेश्वरम



गोदावरी नदीची गणना भारतातील प्रमुख नद्यांमध्ये केली जाते. गोदावरी नदीची लांबी १,४५० किलोमीटर (९०० मैल) आहे. गोदावरीचा उगम नाशिकजवळ त्र्यंबकेश्वर या ठिकाणी महाराष्ट्र राज्यात होतो. साधारणत: आग्नेय दिशेला वाहून गोदावरी राजमहेंद्रीजवळ बंगालच्या

नर्मदा नदी

नर्मदा नदी 




  • उगम-अमरकंटक ९०० मी.
  • मुख-अरबी समुद्र
  • लांबी-१,३१२ कि.मी.
  • देश-भारत ( मध्य प्रदेश , महाराष्ट्र, गुजरात)
  • पाणलोट क्षेत्र-१,००,००० किमी²
  • धरण-सरदार सरोवर धरण(केवडिया कॉलोनी)



नर्मदा नदी भारतातील प्रमुख नद्यांपैकी एक आहे. ही नदी भारताच्या मध्य प्रदेश (१०७७ कि.मी) , महाराष्ट्र (७६ कि.मी), गुजरात (१०० कि.मी.) या राज्यांतून वाहते. नर्मदा भारतीय उपखंडातील पाचव्या क्रमांकाची मोठी नदी असून सर्वांत मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे. नर्मदेला रेवा असेही एक नाव आहे. (इतर पश्चिम वाहिनी मोठ्या नद्या: तापी व मही).

तापी नदी

तापी नदी



  • अन्य नावे -ताप्ती
  • उगम- मुलताईजवळ ७४९ मी.
  • मुख - अरबी समुद्र
  • लांबी- ७२४ कि.मी. कि.मी.
  • देश- मध्य प्रदेश , महाराष्ट्र , गुजरात
  • उपनद्या- पूर्णा, गिरणा नदी , वाघूर
  • पाणलोट क्षेत्र- ६५,१४५ किमी²


•धरण -
उकाई धरण, काकरापार धरण, हतनूर धरण तापी नदी ही भारताच्या पश्चिम भागातून वाहणारी नदी आहे. ही 'पश्चिमवाहिनी' नदी भारताच्या मध्य प्रदेश , महाराष्ट्र व गुजरात या राज्यांमधून वाहते. तापीच्या खोऱ्यात मध्यप्रदेशातील बेतुल जिल्हा , महाराष्ट्रातील विदर्भाचा पुर्व भाग, खानदेश , व गुजराथेतील सुरत जिल्हा समाविष्ट आहे.

गंगा नदी

गंगा नदी 




गंगा ही उत्तर भारतातील नदी जगातील सर्वात मोठ्या नद्यांपैकी एक आहे. गंगेचा उगम हिमालयात भागीरथीच्या रूपात गंगोत्री हिमनदीत उत्तराखंडमध्ये होतो. नंतर ती देवप्रयाग जवळ अलकनंदा नदीला मिळते. यानंतर गंगा उत्तर भारताच्या विशाल पठारावरून वाहत बंगालच्या उपसागराला बऱ्याच शाखांमध्ये विभाजित होऊन मिळते. यामध्ये एक शाखा हुगळी नदी आहे जी कोलकाता जवळून वाहते, दुसरी शाखा पद्मा नदी बांगलादेशात प्रवेश करते. गंगा नदीची पूर्ण लांबी जवळजवळ २५०७ किलोमीटर आहे.

Post views: counter

भारतीय प्रमाणवेळ



भारताची प्रमाण-वेळ ही वेळ युनिव्हर्सल कोऑर्डिनेटेड टाइमपेक्षा ५ तास ३० मिनिटे पुढे आहे. संपूर्ण वर्षाकरीता हा फरक स्थायी आहे. ही वेळ अलाहाबाद वेधशाळेत मोजली जाते. इतर देशांप्रमाणे ॠतूनुसारया वेळेत बदल केला जात नाही. पण १९६२ च्या चीन युद्धावेळी आणि १९६५ व १९७१ च्या पाकिस्तान युद्धांमध्ये असा बदल करण्यात आला होता.

भारताचे स्थान

भारताचे स्थान

भारत पूर्व गोलार्धात मध्यवर्ती स्थानी आहे, तर दुस– या प्रकारे तोउत्तर गोलार्धात येतो. भारताच्याप्रचंड आकारामुळे त्यास उपखंड म्हणतात. भारतीय उपखंडात भारत, मालदिव, पाकिस्थान भुतान, नेपाळ, बांग्लादेश व श्रीलंका यांचा समावेश होतो. भारताची मुख्य भुमी आशिया खंडाच्या दक्षिणेस ८ ० ४ उ. ते ३७ ० ६ उ. अक्षांश ६८ ० ७ पू. ते ९७ ० २५ पू. रेखावृत्तापर्यंत पसरलेली आहे. भारताचे अति दक्षिणेचे टोक म्हणजे इंदिरा पॉइंट ( ग्रेट निकोबार ) ६ ० ३० उत्तर अक्ष वृत्तावर आहे. कर्कवृत्त भारताच्या मध्यातून जाते. ( गुजरात, राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेश, झारखंड, प. बंगाल, त्रिपूरा, व मिझोराम ) भारताचे दक्षिण टोक विषुववृत्तापासुन ८७५ कि.मी. अंतरावर आहे. भारताची पूर्व – पश्चिम लांबी २९३३ कि.मी. असून उत्तर दक्षिण लांबी ३२१४ कि.मी. इतकी आहे.

अरवली पर्वतरांग

अरवली पर्वतरांग 




अरवल्ली पर्वतरांग ही पश्चिम भारतातील एक पर्वतरांग आहे. ही रांग मुख्यत्वे उत्तर गुजरात, राजस्थानच्या पूर्व भागात व मध्य प्रदेशाच्या पश्चिम भागात पसरली आहे. 

• भूविज्ञान-जगातील सर्वात प्राचीन पर्वतांमध्ये अरावलीचा समावेश होतो त्यामुळे भूवैज्ञानिक दृष्ट्या पर्वत महत्त्वाचा आहे. अंदाजे ६० कोटी वर्षांपूर्वी या पर्वताची जडणघडण झाली. राजस्थान आणि गुजरातच्या सीमेवरील माउंट अबू (उंची १७२० मी) हे या पर्वतरांगेतील सर्वोच्च ठिकाण आहे व ते थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते.

वाळवंट

 वाळवंट

  

वाळवंट हे अनेक भौगोलिक रचनांपैकी एक असून पृथ्वीचा बराच भूभाग वाळवंटांनी व्यापला आहे. तथापिवाळवंट हा शब्द केवळ वाळूने व्यापलेल्या प्रदेशालाच लागू होत नाही तर इतर काही भौगोलिक रचनादेखील वाळवंट या संज्ञेत येतात.

प्रकार- वाळवंटांची दोन मुख्य प्रकारांमध्ये विभागणी करता येते.
उष्ण वाळवंटे व शीत वाळवंटे 


वाळूने व्यापलेला प्रदेश ही व्याख्या केवळ उष्ण वाळवंटांसाठीच लागू होते. नावाप्रमाणे उष्ण वाळवंटातील तापमान अतिउष्ण ते शीत या पट्ट्यात येते.

• वैशिष्ट्ये - सर्वसाधारणपणे उष्ण वाळवंटाची पुढील वैशिष्टे सांगता येतील.

• भौगोलिक वैशिष्ट्ये-

  1. वाळूने व्यापलेला प्रदेश. वाळूच्या टेकड्या आणि त्यावरील वैशिष्ट्यपूर्ण अशा वळ्या
  2. हवेतील बाष्पाचे आणि जमिनीतील आर्द्रतेचे अत्यल्प प्रमाण
  3. वर्षभरातील पावसाची अत्यल्प सरासरी

नदी

 नदी 



नैसर्गिक पाण्याच्या रुंद प्रवाहाला नदी असे म्हणतात. नदीचा उगम हा तलाव , मोठा झरा, अनेक छोटे झरे एकत्रित येऊन किंवा बर्फाच्छादित पर्वतापासून होतो.

जगातील सर्वांत जास्त लांबीच्या १० नद्या पुढीलप्रमाणे आहेत.

  1. नाईल नदी ( ६,६९० कि.मी.)
  2. अॅमेझॉन नदी ( ६,४५२ कि.मी.)
  3. मिसिसिपी नदी- मिसूरी नदी ( ६,२७०कि.मी.)
  4. यांगत्झे नदी (चँग जिआंग ) ( ६,२४५ कि.मी.)
  5. येनिसे आंगारा नदी ( ५,५५० कि.मी.)
  6. ह्वांग हो नदी ( ५,५६४ कि.मी.)
  7. ऑब ईर्तीश नदी ( ५,४१० कि.मी.)
  8. आमूर नदी ( ४,४१० कि.मी.)
  9. काँगो नदी ( ४,३८० कि.मी.)
Post views: counter

MPSC Prelim Paper घटक ३-महाराष्ट्राचा भूगोल




                      जर एम.पी.एस.सी. व यू.पी.एस.सी या दोन्ही परीक्षेच्या दृष्टीने बघितल्यास भूगोल हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे.गेल्या दोन वर्षांतील परीक्षेचा अभ्यास केल्यास, असे लक्षात येते की, या घटकावर साधारण 15ते 17प्रश्न विचारले होते. एम.पी.एस.सी.च्या नवीन अभ्यासक्रमात (जो अभ्यासक्रम 'यूपीएससी'सारखाच आहे.) काही बदल करण्यात आले आहेत.

                     उदा. नवीन अभ्यासक्रमात जगाचा भूगोल हा नव्याने समाविष्ट केलेला घटक आहे. जुन्या अभ्यासक्रमानुसार जर कृषिशास्त्राचाही विचार केला तर या भागावर जवळजवळ ३५ ते ४० प्रश्न विचारले जात असत, आपण पीएसआय / एसटीआय / असिस्टंट पूर्व या परीक्षांचाही विचार केला तर या घटकावर साधारणत: 15ते 17प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे.
Post views: counter

सह्याद्री पश्चिम घाट


जागतिक वारसा

२००६ साली भारताने यूनेस्को कडे पश्चिम घाटाला जागतिक वारसा स्थानांमध्ये समाविष्ट करण्यासाठी विनंती केली आहे. यामध्ये एकंदर सात उपक्षेत्रे असतील.

  1. अगस्त्यमलाई उपक्षेत्र - यामध्ये अगस्त्यमलाई संरक्षित जैविक क्षेत्र (९०० वर्ग कि.मी.) ज्यामध्ये तमिळनाडूतील कलक्कड मुंडणथुराई व्याघ्र प्रकल्प (८०६ वर्ग कि.मी.) व नेय्यार अभयारण्य  , पेप्पारा तसेच शेंदुर्णीव त्याच्या आसपास असणारे आचेनकोईलचे क्षेत्र , थेन्मला, कोन्नी  , पुनलुर , तिरुवनंतपुरम आणि अगस्त्यवनम, केरळ यांचा समावेश आहे.
  2. पेरियार उपक्षेत्र - यामध्ये केरळमधील पेरियार राष्ट्रीय उद्यान (७७७ वर्ग कि.मी.), रान्नी , कोन्नी व आचनकोविल इथली जंगले. पूर्वेला श्रीविल्लीपुत्तुर अभयारण्य व तिरुनवेली इथली जंगले यांचा समावेश आहे.
  3. अनामलाई उपक्षेत्र - यामध्ये चिन्नार अभयारण्य , एराविकुलम राष्ट्रीय उद्यान (९० वर्ग कि.मी.), इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान, ग्रास हिल्स राष्ट्रीय उद्यान व करियन शोला राष्ट्रीय उद्यान (एकूण ९५८ वर्ग कि.मी.) तसेच तमिळनाडूमधील पलानी पर्वतरांग राष्ट्रीय उद्यान (७३६.८७ वर्ग कि.मी.) व केरळमधील परांबीकुलम अ भयारण्य (२८५ वर्ग कि.मी.) यांचा समावेश आहे. निलगिरी उपक्षेत्र - यामध्ये निलगिरी संरक्षित जैविक क्षेत्र तसेच करीम्पुझा राष्ट्रीय उद्यान (२३० वर्ग कि.मी.), सायलंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान (८९.५२ वर्ग कि.मी.) व केरळमधील वायनाड अभयारण्य (३४४ वर्ग कि.मी.) आणि तमिळनाडूमधील बंदीपूर राष्ट्रीय उद्यान (८७४ वर्ग कि.मी), मुकुर्थी राष्ट्रीय उद्यान (७८.४६ वर्ग कि.मी.), मुदुमलाई राष्ट्रीय उद्यान (३२१ वर्ग कि.मी.) तसेच अमरांबलमचे संरक्षित जंगल (६,००० वर्ग कि.मी.) यांचा समावेश आहे.
Post views: counter

भारतातील लोहमार्ग विभाग व त्यांची मुख्यालय :


भारतातील लोहमार्ग विभाग व त्यांची मुख्यालय :


क्र        विभागाचे नाव              मुख्यालय

1. मध्य विभाग------------------ मुंबई
2. पूर्व विभाग-------------------- कोलकाता
3. उत्तर विभाग -----------------नवी दिल्ली
4. उत्तर पूर्व विभाग------------- गोरखपूर
5. उत्तर पूर्व सीमा विभाग ------गुवाहाटी
6. दक्षिण विभाग ----------------चैन्नई
7. दक्षिण मुख्य विभाग----------सिकंदराबाद
8. दक्षिण पूर्व विभाग----------- कोलकाता
9. पश्चिम विभाग चर्चगेट ------मुंबई
10. पूर्व मध्य विभाग हाजीपूर---बिहार
11. पूर्व किनारी विभाग--------- भुवनेश्वर
12. उत्तर मध्य विभाग --------अलाहाबाद
13. उत्तर पश्चिम विभाग-------जयपूर
14. दक्षिण पूर्व मध्य विभाग ---विलासपुर
15. दक्षिण पश्चिम विभाग----- हुगळी
16. पश्चिम मध्य विभाग------ जबलपूर
17. मेट्रो रेल्वे झोन -------------कोलकाता

विविध क्रांत्या :

विविध क्रांत्या :


  1. हरित क्रांती -अन्नधान्य उत्पादन
  2. नील क्रांती- मत्स्य उत्पादन
  3. पीत क्रांती- तेलबिया उत्पादन
  4. सुवर्ण क्रांती -फळे उत्पादनात वाढ
  5. कृष्णा क्रांती- पेट्रोलियम क्षेत्र
  6. करडी क्रांती- खत उत्पादन
  7. श्वेत क्रांती-दुग्धोत्पादन
  8. गुलाबी क्रांती -कोळंबी उत्पादन
  9. चंदेरी क्रांती-अंडी उत्पादन
  10. अमृत क्रांती-नद्याजोड प्रकल्प
Post views: counter

भूकंप का होतात?

 भूकंप का होतात?
                         भूगर्भातील दोन खडक किंवा प्लेट्‌सचे एकमेकांवर जोरदार घर्षण होते. हे खडक प्लेट्‌स एकमेकांना ढकलत असतानाच प्रचंड दबावामुळे दुभंगतात. या प्रक्रियेचा पृथ्वीच्या पृष्ठभागावर जाणवणारा परिणाम म्हणजेच भूकंप होय.
                         हे खडक किंवा प्लेटची भूकंपादरम्यान आणि नंतरही पुन्हा एकत्र होईपर्यंत हालचाल होत राहते.

  • भूकंपाचे मोजमाप :
                       भूकंपाची नोंद घेणाऱ्या यंत्रास ‘सेस्मोग्राफ’ अथवा ‘सेस्मॉमीटर’ असे नाव आहे. तसेच भूकंपाची ’महत्ता’ मोजण्यासाठी ‘रिश्टर स्केल’ ह्या एककाचा वापर केला जातो. हे एक गणिती एकक आहे. पाच स्केलच्या भूकंपातून निर्माण होणारी ऊर्जा, चार रिश्टर स्केलच्या भूकंपाच्या दहापट असते.  भूकंपाची ’तीव्रता’ मापण्याचे एक वेगळे अ-गणिती स्केल आहे. त्याचा संबंध भूकंपाने होणाऱ्या नुकसानीशी निगडित असतो, ऊर्जेशी नसतो.
३ रिश्टर स्केल वा त्यापेक्षा कमी महत्तेचे भूकंप जास्त धोकादायक नसतात. महत्ता ७ किंवा त्यापेक्षा जास्त