Post views: counter

Current Affairs March 2015 Part-1

चालू‬ घडामोडी:- मार्च २०१५
  • कर्णधार महेंद्रसिंह धोनीने विदेशात सर्वाधिक एकदिवसीय सामने जिंकण्याचा सौरभ गांगुलीचा विक्रम मोडीत काढला.भारतीय संघाने धोनीच्या नेतृत्त्वात आतापर्यत परदेशात किती विजय मिळविले आहेत?
 - ५९
  • कर्णधार म्हणून सर्वाधिक सामने खेळण्याच्या कोणत्या माजी भारतीय कर्णधाराच्या विक्रमाची बरोबरी महेंद्रसिंग धोनीने केली आहे?
- मोहम्मद अझहरुद्दीन(१७४ सामने)
  • वने डे कारकिर्दीत एकही शतक न ठोकता ५ हजार धावांचा टप्पा ओलांडणारा खेळाडू कोण?
  - मिस्बाह उल हक
  • २००२ सालच्या गुजरात दंगलीत गुलबर्ग सोसायटीतील पीडित व्यक्तींसाठी जमा केलेल्या पैशाच्या गैरव्यवहारप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांच्या चौकशीसाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास

पंचशील आणि अलिप्ततावाद

  • पंडित नेहरुंचे परराष्ट्र धोरण

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताचे पंतप्रधान म्हणून पंडित नेहरुंनी सूत्रे हाती घेतली. पंतप्रधानपदाबरोबरच परराष्ट्र खात्याचा कार्यभारही नेहरुंनी आपल्याकडेच ठेवला नेहरुंना जागतिक इतिहासाची सखोल माहिती होती. तसेच आंतराराष्ट्रीय संबंधाची चांगली जाण होती. नेहरुंनी देशाच्या हितसंबंधाला अग्रक्रण देऊन आंतरराष्ट्रीय राजकारणात पंचशील धोरणाच्या माध्यामातून जागतिक शांतता व सहकार्य वृध्दिंगत केले. तर अलिप्ततेच्या

स्वतंत्र भारताची राज्यघटना

लोकनियुक्त घटना समितीची कल्पना सर्व प्रथम मानवेंद्रनाथ रॉय यांनी १९२७ मध्ये सायमन कमिशन पुढे मांडली भारतमंत्री र्बकन हेड यांच्या आवाहनानुसार भारतीय नेत्यांनी नेहरू रिर्पोट च्या स्वरुपात १९२८ मध्ये घटनेबाबतच्या शिफारशी देण्यात आल्या होत्या. गोलमेज परिषदेतही घटना निर्मितीबाबत कॉंग्रेसने आग्रह धरला. ३० मार्च १९४२ रोजी क्रिप्स योजना जाहीर झाली. त्यानुसार महायुध्द समाप्तीनंतर भारतासाठी एक घटना परिषद नेमण्याचे आश्र्वासन देण्यात आले व १९४६ च्या कॅबिनेट मिशन त्रिमंत्री योजनेनुसार घटना समितीच्या निर्मितीची तरतूद करण्यात आली.

भारतातील फ्रेंच आणि पोर्तुगीज वसाहतींची मुक्तता

  • फ्रेंच वसाहतींची मुक्तता :-

युरोपीय व्यापार्‍यांनी मुघल बादशहांकडून व्यापारी परवाने मिळवून भारतात अनेक ठिकाणी आपआपल्या वसाहती निर्माण केल्या. फ्रेंच वसाहतकारांनी पांडेचरी, माहे, कारिकल, चंद्रनगर, इ. ठिकाणी वसाहतींची स्थापना केली. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर १७०७ मुघल साम्राज्य कमकुवत झाले याचा फायदा युरोपीय व्यापारी कंपन्यांनी घेतला व्यापाराच्या मक्तेकदारीवरुन इंग्रज व फ्रेंच यांच्यात मोठी स्पर्धा झाली. दक्षिण भारताच्यापूर्व किनार्‍यावरील चेन्नई, येथे इंग्रजांची मुख्य वखार होती. तर चेन्नई शेजारीच पॉडेचरी हे फ्रेंचांचे मुख्य ठाणे होते.

संस्थानिक राज्यांचे विलीनीकरण

  • भारतीय संस्थानिकांचा पूर्व इतिहास

ब्रिटिश राजवटीत हिंदुसथानचे ब्रिटिश भारत व संस्थानिकांचे राज्य अशा दोन भागात करण्यात आले. संस्थानिक ब्रिटिश सरकारचे मांडलिक होते. १७५७-१८१३ या कालखंडात संस्थानांना सन्मानाची वागणूक दिली १८५८ च्या राणीच्या जाहीरम्यानुसार संस्थानांना अभय देण्यात आले. पुढील काळात ब्रिटिश रेस्ंिाडेंटच्या माध्यामातून संस्थानांच्या राज्यकारभारातील हस्तक्षेप सुरुच राहिला.