Post views: counter

पालघर जिल्हा निर्मित


 पालघर जिल्हा
पालघर जिल्हा ठाणे जिल्ह्याचे विभाजन करुन 1 ऑगस्ट 2014
रोजी निर्मित करण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातील 36 वा जिल्हा
म्हणुन निर्माण झालेला जिल्ह्याचे मुख्यालय पालघर हेच असेल.

नव्याने निर्णान झालेल्या या जिल्ह्यात खालील 8 तालुके असतील -
• वसई
• वाडा
• जव्हार
• मोखाडा
• पालघर
• डहाणू
• तलासरी
• विक्रमगड

ठाणे जिल्ह्यात पंधरा तालुके होते . त्यात तलासरी, डहाणू,
जव्हार, मोखाडा, पालघर , विक्रमगड, वाडा, शहापूर

थोडक्यात महत्वाचे

महाराष्ट्रातील ज्योतिर्लिँगे !!!  
  1. घृष्णेश्वर - वेरूळ, औरंगाबाद
  2. परळी वैज्यनाथ - परळी, बीड
  3. औँढा नागनाथ - औँढा, हिँगोली
  4. भीमाशंकर - पुणे
  5. ञ्यंबकेश्वर – नाशिक
जगातील सर्वात लांब !!
  1. सर्वात लांब नदी - नाईल (इजिप्त) ६६७० किमी
  2. सर्वात लांब नदी - लँम्बर्ट (अंटार्क्टिका) ४०२ किमी
  3. सर्वात लांब कालवा - सएज कालवा (इजिप्त) १६२ किमी
  4. रेल्वेचा सर्वात लांब बोगदा - सैकन रेल्वे बोगदा जपान.
  5. सर्वात लांब भिँत - चीनची भिँत (२२४० मी)
विवीध क्रांती-
  1. हरितक्रांती - अन्नधान्य उत्पादनात वाढ
  2. धवलक्रांती - दुध उत्पादनात वाढ
  3. श्वेतक्रांती - रेशीम उत्पादनात वाढ
  4. लालक्रांती - शेळी, मेँढी उत्पादनात वाढ
  5. नीलक्रांती - मत्स्योत्पादनात वाढ
  6. पीतक्रांती - तेलबिया उत्पादनात वाढ
  7. ईक्रांती - इलेक्ट्राँनिक माध्यमांचा वापर
  8. तपकिरी क्रांती - कोकोच्या उत्पादनात वाढ

Making of Indian Constitution

भारतीय राज्यघटना :
  • पार्श्वभूमी:दुसरे महायुध्द संपुष्टात आल्यानंतर, भारतीयांने ज्या आश्वासनावर ब्रिटिशांना मदत केली. ते आश्वासन पूर्ण करण्यासाठी १९४२ मध्ये स्टॅफोर्ड क्रिप्स यांच्या नेतृत्वाखाली एक आयोग भारतात पाठवण्यात आले. मात्र स्टॅफोर्ड क्रिप्स यांनी जो अहवाल तयार केला त्यामध्ये भारताच्या स्वातंत्र्याविषयी कोणत्याही प्रकारचा उल्लेख करण्यात आलेला नव्हता. त्यामुळे भारतातील नेत्यांकडून या अहवालाविषयी नाराजी व्यक्त करण्यात आली.त्यानंतर १९४६ मध्ये ‘त्रिमंत्री मंडळ’ भारताविषयी निर्णय घेण्यासाठी पाठवण्यात आले. या मंडळामध्ये पॅट्रिक लॉरेन्स, स्टॅफोर्ड क्रिप्स व ए.व्ही. अलेक्झांडर यांचा समावेश होता. या मंडळाच्या शिफारशीनुसार ब्रिटीश सरकारने भारताच्या स्वातंत्र्याची मागणी स्वीकारली होती. त्यामुळे भारतामध्ये सर्वात मोठा पक्ष असणाऱ्या कॉंग्रेसने या मंडळाचा अहवाल स्वीकारला होता. 
या त्रिमंत्री योजनेच्या शिफारशीमध्ये स्वतंत्र भारताची राज्यघटना बनवण्याची एक महत्वाची शिफारस होती. या शिफारशीनुसार जुलै १९४६ मध्ये घटना परिषदेच्या निवडणुका घेण्यात आल्या. निवडून आलेल्या सदस्यांची पहिली बैठक ९ डिसेंबर १९४६ मध्ये घेण्यात आली.
घटना परिषदेची रचना : 
  1. घटना परिषदेतील सदस्यांची संख्या- ३८९ यामध्ये २९६- सदस्य ब्रिटिश भारतातील होते, तर ९३- सदस्य हे भारतीय संस्थानातील होते. 
  2. निवडण्यात आलेले सदस्य हे १० लाख लोकसंख्येमागे एक सदस्य या प्रमाणात निवडण्यात आलेले होते.
  3. भारतातील सर्व समाजातील प्रतिनिधींना सभासदत्व देण्यात आलेले होते.

विशिष्ठ विषयाच्या अभ्यासाला काय म्हणतात ?

  1. हवामनाचा अभ्यास------------------------------- मीटिअरॉलॉजी
  2. रोग व आजार यांचा अभ्यास--------------------- पॅथॉलॉजी
  3. ध्वनींचा अभ्यास---------------------------------- अॅकॉस्टिक्स
  4. ग्रह-तार्यांचा अभ्यास----------------------------- अॅस्ट्रॉनॉमी
  5. वनस्पती जीवनांचा अभ्यास---------------------- बॉटनी
  6. मानवी वर्तनाचा अभ्यास-------------------------- सायकॉलॉजी
  7. प्राणी जीवांचा अभ्यास--------------------------- झूलॉजी
  8. पृथ्वीच्या पृष्ठ भागावरील पदार्थांचा अभ्यास----- जिऑलॉजी
  9. कीटकजीवनाचा अभ्यास------------------------ एन्टॉमॉलॉजी
  10. धातूंचा अभ्यास----------------------------------- मेटलर्जी

लॉर्ड आयर्विन (१९२६ – १९३१)

                            लॉर्ड आयर्विन (१९२६ – १९३१) 

लॉर्ड आयर्विनच्या काळातील महत्वपूर्ण घटना –


१) सायमन कमिशन :
  1. १९१९ च्या माँटेग्यु चेम्सफोर्ड कायद्यात सुधारणा करण्याच्या दृष्टीने शिफारशी करण्यासाठी तत्कालीन भारतमंत्री लॉर्ड बर्कनहेड यांनी भारतात सायमन कमिशन पाठविण्याची घोषणा केली. तेंव्हा ब्रिटनचे पंतप्रधान सर रॅम्से mमॅक्डोनॉल्ड हे होते. घोषणेनुसार त्यांनी ७ सदस्य असलेली एक समिती इस. १९२७ मध्ये नियुक्त केली. या समितीच्या अध्यक्षपदी सर जॉन सायमन यांची नियुक्ती करण्यात आली. या समितीतील सातही सदस्य इंग्रज असल्यामुळे भारतीयांनी सायमन कमिशनला विरोध केला. 
  2. इस. १९२८ मध्ये सायमन कमिशनने भारतभर दौरा केला. ठिकठिकाणी “सायमन गो बॅंक” ही घोषणा देवून सायमन कमिशनला विरोध करण्यात आला. अशाच एका मोर्चाचे नेतृत्व करणा-या लाला लजपतराय यांच्यावर लाठी हल्ला झाला. थोड्या दिवसातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. 
  3. १० ऑगस्ट १९२८ रोजी नेहरू अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. मुस्लीम लीग व हिंदू महासभेने नेहरू अहवाल फेटाळून लावला.