Post views: counter

लोकमान्य टिळक

लोकमान्य टिळक 

                                   टिळकांचा जन्म २३ जुलै इ.स. १८५६ मध्ये रत्‍नागिरीमधील मधल्या आळीत, एका मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबात झाला. टिळकांच्या वडिलांचे नाव गंगाधर आणि आईचे नाव पार्वतीबाई होते. टिळकांचे पूर्वज रत्‍नागिरीजवळील चिखलगावाचे खोत होते.
                                 गंगाधरपंतांचे ते तीन मुलींनंतरचे चौथे अपत्य होते. त्यांचे खरे नाव केशव ठेवले असले तरी सर्वजण त्यांना बाळ या टोपणनावानेच ओळखत असत.त्यांचे वडील गंगाधर रामचंद्र टिळक प्रसिद्ध शिक्षक आणि संस्कृत पंडित होते. लहानपणापासूनच टिळक अत्यंत हुशार विद्यार्थी होते आणि त्यांना गणितामध्ये विशेष गती होती. टिळकांना लहानपणापासूनच अन्यायाबद्दल चीड होती. वयाच्या दहाव्या वर्षी गंगाधर टिळकांची बदली पुण्याला झाली. पु्ण्यातील वास्तव्याचा मोठा परिणाम टिळकांच्या आयुष्यावर झाला. त्यांनी पुण्यात एका अँग्‍लो-व्हर्न्याक्युलर शाळेत प्रवेश घेतला. तेथे त्यांना अनेक प्रसिद्ध शिक्षकांच्या हाताखाली शिकण्याची संधी मिळाली.

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे

विठ्ठल रामजी शिंदे 


जन्म - 23 एप्रिल 1873, जामखिंडी, कर्नाटक. 
मृत्यू - 2 जानेवारी 1944.

1932 - 33: 
  1. बडोदा संस्थानचे सयाजीराव गायकवाड परितोषिक.
  2. 'महाराष्ट्राचे अपेक्षित मानकरी' गं. बा. सरदार.
  3. 'निष्काम कर्मयोगी', भाई माधवराव बागल.
  4. जनतेकडून 'महर्षी' ही पदवी.
  5. अस्पृश्यता निर्मूलनाचा प्रश्र्न राष्ट्रीय एकात्मतेशी जोडला. 
संस्थात्मक योगदान :
  1. 1905 - मुंबई येथे तरुण अस्तिकांचा संघ स्थापन.

समाजसुधारकांची वृत्तपत्रे

समाजसुधारकांची वृत्तपत्रे व संपादक


  1. दर्पण - बाळशास्त्री जांभेकर - 6 जानेवारी 1832
  2.  दिग्दर्शन (मासिक) - बाळशास्त्री जांभेकर - 1840
  3.  प्रभाकर (साप्ताहिक) - भाऊ महाराज
  4.  हितेच्छू (साप्ताहिक) - लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख
  5.  काळ (साप्ताहिक) - शी.म.परांजपे
  6.  स्वराज्य पत्र (साप्ताहिक) - शी.म.परांजपे
  7.  केसरी - लोकमान्य टिळक

नंरेद्र मोदी सरकारच्या विकास योजना

नंरेद्र मोदी सरकारच्या विकास योजना
  • जन-धन योजना:-

देशातील प्रत्येक नागरिकाला बँकेत खाते उघडून देण्यासाठी जन-धन ही महत्वकांक्षी योजनासुरू करण्याचा निर्णय मोदी ने १५ आँगस्ट २०१४रोजी आपल्या भाषणात या योजनेची घोषणा केले . ही योजना सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी १.५ कोटी लोकांनी बँकखाते उघडून सरकारच्या निर्णयाला अभुतपूर्वप्रतिसाद दिला. या योजनेतंर्गत आतापर्यंतदे शभरात १४ कोटी बँक खाती उघडण्यात आली आहेत.
  • स्वच्छ भारत अभियान:- 
नरेद्र मोदिनी २ आक्टो २०१४ रोजी( गांधी जयंती) ही योजना नवी दिल्ली येथील राजघाट येथून सुरु केली स्वच्छ भारत अभियान स्वच्छ भारत अभियानातंर्गत आगामी पाच वर्षात भारतातील प्रत्येक परिसर स्वच्छ बनविण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आलेआहे. याशिवाय, शहरी आणि ग्रामीण
Post views: counter

महाराष्ट्राचा समग्र भूगोल




                          सध्याच्या गुजरात व महाराष्ट्र राज्याचे मिळुन दि . १ नोव्हेंबर १९५६ रोजी द्विभाषिक मुंबई राज्य स्थापन झाले. मध्य प्रांतातून व हैद्राबाद राज्यातून मराठवाडा मुंबई राज्याला जोडले. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. व गुजरात मुंबई राज्यातून वेगळे केले गेले.
  • स्थान – १५.८ उत्तर ते २२.१ उत्तर अक्षांश , ७२.३६ पुर्व ते – ८०.९ पुर्व रेखांश दरम्यान.
  • क्षेत्रफळ – ३.०७,७१३ चौ.कि.मी.
  • क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा राजस्थान, मध्य प्रदेशानंतर देशात तिसरा क्रमांक लागतो.
    महाराष्ट्र देशाच्या ९.३६% क्षेत्रफळाने व्यापलेला आहे.
  • लांबी – पुर्व पश्चिम लांबी ८०० कि.मी.
  • रुंदी - उत्तर दक्षिण ७०० कि.मी. आहे.
  • किनारपट्टीची लांबी ७२० कि.मी.

  • सीमा

नैसर्गिक सीमा – 
  • वायव्येस सातमाळा डोंगररांगा, गाळण टेकड्या व सातपुडा पर्वतातील आक्रणी टेकड्या आहेत. 
  • उत्तेरस सातपुडा पर्वत, त्याच्या पूर्वेस गाविलगड टेकड्या आहेत.
  • ईशान्येस दरकेसा टेकड्या व पूर्वेस चिरोल टेकड्या आणि भामरागड डोंगर आहे. 
  • पश्चिमेस अरबी समुद्र असून राज्याची किनारपट्टी उत्तरेकडील दमण गंगा नदीपासून दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत पसरलेली आहे.