Post views: counter

महाराष्ट्र पठाराची निर्मिती




महाराष्ट्र पाठाराची निर्मिती ज्वालामुखीच्या उद्रेकातून झाली.70 दशलक्ष वर्षापूर्वी - भ्रंशमुलक उद्रेक झाला व लाव्हारसाचे संचयन झाले. अशा प्रकारच्या अनेक उद्रेकापासून महाराष्ट्र पठार तयार झाले. या पठारावर अग्निजन्य खडक आढळतात.भुपृष्टावर किंवा कमी खोलीवर आढळणारे 'असिताश्म व कृष्णप्रस्तर' हे दोन प्रकारचे खडक आढळतात.महाराष्ट्र पठारावर उत्तरेकडून दक्षिणेकडे पुढील खोरी आढळतात.
  • तापी-पूर्णा खोरे 
  • गोदावरी खोरे 
  • प्रणहिता खोरे 
  • भीमा खोरे
  • कृष्णा खोरे 
 आर्कियन खडक :

हा अतिप्राचीन खडक पूर्व विदर्भा, चंद्रपुर, भंडारा, गडचिरोली, नांदेड जिल्ह्याचा पूर्वभाग आणि सिंधुदुर्गातील काही तालुक्यांमध्ये आढळतो.
ग्रँनाईट, नीस व शिस्ट प्रकारच्या खडकांपासून बनलेल्या या भुस्तरात लोह खनिजांचे विपुल साठे आहेत.
 धारवाड खडक : या श्रेणीच्या खडकांमध्ये ग्रँन्जुलाईट्स

Current Affairs Sept 2015 Part - 5




  • सौरव गांगुली बनला कॅबचा अध्यक्ष

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याला गुरुवारी बंगाल क्रिकेट संघटनेचा (कॅब) अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. गांगुलीला अध्यक्ष नियुक्त केल्याची घोषणा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्य सचिवालयात कॅबच्या सिनियर पदाधिकारी आणि राज्य सरकारच्या मंत्र्यांच्या उपस्थितीत केली.एक अन्य महत्त्वपूर्ण घटनाक्रमात दालमिया यांचे चिरंजीव अभिषेक यांना दोन संयुक्त सचिवांपैकी एका पदावर नियुक्त करण्यात आले. अभिषेक दालमिया गांगुलीची जागा घेतील. सुबीर गांगुली दुसरे संयुक्त सचिव म्हणून पूर्वीप्रमाणेच जबाबदारी पार पाडतील. विश्वरूप डेदेखील कोषाध्यक्ष म्हणून कायम असतील.हा निर्णय कॅब पदाधिकाऱ्यांनी घेतला असे मुख्यमंत्र्यांनी अधिकृतरीत्या स्पष्ट केले. आपण फक्त राज्यांत क्रिकेटला पुढे आणण्यास पाठिंबा व्यक्त करण्यासाठी उपस्थित होतो, असे त्यांनी म्हटले; परंतु दिवंगत दालमिया यांच्या स्थानी गांगुलीला नियुक्त करण्यात सरकारने हस्तक्षेप केला. मी हस्तक्षेप करणे योग्य नव्हते. त्यांनी चांगले काम करावे हीच माझी इच्छा होती. मी फक्त एक सहकारी म्हणून उपस्थित होते. सर्वांनी मिळून हा निर्णय घेतला. मी घोषणा करू इच्छित नव्हते; परंतु सर्वांनी मला आग्रह केला. अनेक वर्षे देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सौरव गांगुलीसारख्या खेळाडूने ही भूमिका बजवायला हवी असे मला वाटले आणि त्याने अभिषेक, सुबीर, विश्वरूप आणि अन्य सर्वच सिनियर सदस्यांच्या रूपाने एक टीम बनवायला हवी, असे बॅनर्जी म्हणाले .

  • वाळू उत्खननाचे नवे धोरण:

•देशभर फोफावलेल्या वाळू माफियांना चाप लावण्यासाठी केंद्र सरकारने वाळू उत्खनन धोरणाचा नवा मसूदा तयार केला
•यापुढे सरसकट वाळू उत्खनन
Post views: counter

Current Affairs Sept 2015 Part - 4


  • काही नवीन योजना:- श्या:माप्रसाद मुखर्जी "रूर्बन‘


 योजना(एसपीएमआरएम)

•स्मार्ट सिटी‘ योजनेच्या पाठोपाठ आता स्मार्ट गावे तयार करण्यासाठी व शहरांकडील स्थलांतर थांबवण्याच्या उद्देशाने देशाच्या 300 विभागांत स्मार्ट गावे निर्माण करण्याची श्याशमाप्रसाद मुखर्जी "रूर्बन‘ योजना (एसपीएमआरएम) सरकारने घोषित केली
•स्मार्ट गाव योजनेसाठी केंद्राकडून 5142 कोटी रुपयांची प्रारंभिक तरतूद
•यासाठी 300 विभाग आहे त्यातील गावांची संख्या धरली तर हजारो गावे या योजनेत समाविष्ट होतील
* पहिल्या टप्प्यात 100 विभाग केले जातील. एकेका विभागात मिळून गावांची एकूण लोकसंख्या 25 ते 50 हजार व दुर्गम तसेच वाळवंटी भागात पाच ते 15 हजार अशी अट असेल
•गावांना स्मार्ट बनविण्यासाठी 15 ठळक निकष  आहे ग्रामीण भारताचा आर्थिक, सामाजिक व पायाभूत सुविधा या तिन्ही बाजूंनी सर्वंकष विकास करण्यासाठी नवी योजना सरकारने घोषित केली आहे. यात पायाभूत सुविधा, रस्ते, आरोग्य, शिक्षण, पिण्याचे पाणी, इंटरनेट सुविधा, तरुणांना कौशल्य विकासाच्या प्रशिक्षणासह त्याबाबतच्या संधी, शेतमालासाठी सुलभतेने बाजारपेठ मिळवून देणे आदींचा समावेश असेल.
•ग्रामीण भागाचा सर्वंकष विकास करणार
•गावांचा विकास करण्यासाठी राज्यांनी केंद्राकडे प्रस्ताव व संभाव्य गावांची नावे पाठवायची आहेत

  • 'नासा'कडून छायाचित्रे प्रसिद्ध :


अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था 'नासा'ने प्लुटोची नवी छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. "नासा"च्या न्यू हॉरिझॉन या अवकाश यानाने घेतलेल्या या छायाचित्रांमध्ये प्लुटोवर हिमशिखरे, पठारे आणि धूसर वातावरण असल्याचे दिसून आले आहे. या नव्या छायाचित्रांवरून प्लुटोवरील वातावरण पृथ्वीसारखेच दिसत असून, जलचक्रासमान प्रक्रिया

Current Affairs Sept 2015 Part - 3




  • फोर्ब्ज मासिकाच्या दानशूर व्यक्तींच्यायादीत सात भारतीय

फोर्ब्ज मासिकाच्या ताज्या आशिया आवृत्तीतीलदानशूर व्यक्तींच्या यादीत सात भारतीय दानशूरांचा समावेश आहे. उल्लेखनीय दातृत्वाची दखल घेऊन १३ देशांतील दानशूर व्यक्तींचा या यादीत समावेश करण्यात आला आहे.त्यात सेनापती गोपालकृष्णन, नंदन नीलेकणी आणि एस. डी. शिबुलाल या 'इन्फोसिस'च्या तीन सहसंस्थापकांचाही समावेश आहे. आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात त्यांनी केलेल्या वैयक्तिकदानाची दखल घेऊन त्यांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे.नारायणमूर्ती यांचा मुलगा रोहन याने प्राचीन भारतीय साहित्याच्या प्रसार-प्रचारासाठी हार्वर्ड विद्यापीठाला ५२ लाख डॉलरची मदत केली आहे. त्यामुळे त्याचे नावही या यादीत आहे.त्या व्यतिरिक्त मूळचे केरळमधील असलेले दुबईतील व्यावसायिक सनी वार्की, मूळचे भारतीय असलेले लंडनस्थित उद्योजक बंधू सुरेश आणि महेश रामकृष्णन यांचाही या यादीत समावेश आहे.


  • भारतीय वंशाच्या मुलाने स्पेलिंग बी स्पर्धा जिंकली


भारतीय वंशाच्या नऊ वर्षांचा अनिरुद्ध काथिरवेलने ऑस्ट्रेलियातील ‘द ग्रेट ऑस्ट्रेलियन स्पेलिंग बी’ स्पर्धा जिंकली.या स्पर्धेचे बक्षीस ५० हजार डॉलर असून, त्याच्या शाळेलाही १० हजार डॉलरचे साहित्यही देण्यात येणार आहे.तमीळ कुटुंबातील आणि मेलबर्न येथे जन्मलेल्या अनिरुद्धची स्मरणशक्ती एवढी दांडगी आहे की, तो दररोज सरासरी दहा नवीन इंग्रजी शब्द आत्मसात करतो.

Post views: counter

विज्ञान व तंत्रज्ञान विकास या घटकाची तयारी कशी करावी ?


               अर्थव्यवस्थेच्या विकासाचा विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासाशी जवळून संबंध असल्याने ‘विज्ञान-तंत्रज्ञान’ हा घटक अर्थशास्त्राशी संबंधित एमपीएससीच्या मुख्य परीक्षेच्या पेपर ४ मध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. या घटकाची तयारी कशी करावी, याविषयी..
अर्थव्यवस्थेचा विकास हा बव्हंशी विज्ञान व तंत्रज्ञानाच्या विकासावर अवलंबून असतो. उमेदवारांनी पूर्व परीक्षेसाठी ‘सामान्य विज्ञान’ समजून घ्यायला हवे. मुख्य परीक्षेसाठी सामान्य विज्ञान विषयाचे उपयोजन म्हणजेच तंत्रज्ञान हे वेगवेगळ्या ‘आíथक’ बाबींशी संबंध जोडून अभ्यासायला हवे अशी आयोगाची अपेक्षा आहे. मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम पाहिल्यानंतर लक्षात येते की, तंत्रज्ञान व त्याचा मानवी कल्याणासाठी उपयोग या अनुषंगाने सर्व घटक अभ्यासणे आयोगाला अभिप्रेत आहे. या घटकाचा पद्धतशीर अभ्यास कशा प्रकारे करायचा ते पाहू या.