Post views: counter

राजर्षी शाहू महाराज

राजर्षी शाहू महाराज


                          राज्याच्या सर्वांगीण विकासाचे सर्वोत्तम उदाहरण घालून देणारे आदर्श शासनकर्ते आणि बहुजनांमध्ये प्रचंड आत्मविश्र्वास निर्माण करणारे द्रष्टे समाजसुधारक ! चौथे शाहू, अर्थात राजर्षी छत्रपती शाहू
महाराज , ( जून २६ , इ.स. १८७४ - मे ६ , इ.स. १९२२) हे कोल्हापूर संस्थानाचे इ.स. १८८४-१९२२ सालांदरम्यान छत्रपती होते.
                           राजर्षी शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव होते. त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील घाटगे घराण्यात झाला. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी यशवंतरावांना दत्तक घेतले. १८९४ मध्ये महाराजांचा राज्यारोहण समारंभ झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर १९२२ पर्यंतची २८ वर्षांची त्यांची कोल्हापूर संस्थानातील कारकीर्द महाराष्ट्राच्या इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरते.

महत्वाच्या नियुक्त्या

महत्वाच्या नियुक्त्या
  • विदेश दौऱ्याहून परतताच राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केंद्रीय दक्षता आयुक्त (सीव्हीसी) आणि मुख्य माहिती आयुक्त (सीआयसी) या दोन महत्त्वपूर्ण पदांवरील नियुक्तींना मंजुरी दिली आहे.
  • केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे माजीप्रमुख के. व्ही. चौधरी हे नवे सीव्हीसी तर विजय शर्मा हे मुख्य माहिती आयुक्त असतील.
  • एक आठवड्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्रमोदी आणि काँग्रेसचे लोकसभेतील नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या समितीने या नावांनामंजुरी दिली होती.
  • चौधरी यांची सीव्हीसीपदी झालेलीनियुक्ती ही परंपरेला छेद देणारी आहे.आजवर आयएएस अधिकाऱ्यांचीच या पदी नियुक्ती होत आली आहे.

भारतातील आणीबाणी

                         देशाच्या अंतर्गत सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे, असा दावा करत भारतात 40 वर्षांपूर्वी आणीबाणी जाहीर करण्यात आली. आज आणीबाणीच्या अंधारयुगाला 40 वर्षे पूर्ण होत आहेत... त्यानिमित्ताने आणीबाणीचा हा थोडक्यात आढावा :
 
  • आणीबाणीची घोषणा
                          आजपासून बरोबर 40 वर्षांपूर्वी 25 जूनच्या मध्यरात्रीनंतर आणि 26 जूनच्या पहाटे पंतप्रधान इंदिरा गांधींनी आणीबाणी जाहीर केली. 26 जूनच्या सकाळी आठ वाजता देशाला उद्देशून आकाशवाणीवरून भाषण करताना त्या म्हणाल्या की, देशात अराजकसदृश स्थिती निर्माण झाली आहे. देशाचे स्थैर्य आणि सार्वभौमत्व धोक्यात आणले गेले आहे. लोकांची माथी भडकावली जात आहेत आणि कायदा, सुव्यवस्था व शिस्त प्रस्थापित करण्यासाठी सरकारला काही कठोर पावले उचलणे भाग पडले आहे. ते कठोर पाऊल म्हणजेच आणीबाणी.
26 जून 1975 रोजी सकाळी 8 वाजता इंदिरा गांधींनी आकाशवाणीवरुन देशवासीयांना उद्देशून म्हटलं :
"भाईयों और बहनों, राष्ट्रपती जी ने आपातकाल की घोषणा की है.. इससे आतंकित होने का कोई कारण नहीं"- इंदिरा गांधी

Current Affairs June 2015

  • 'ब्लू मॉरमॉन'ला राज्य फुलपाखराचा  दर्जा

Blue Mormon

                        महाराष्ट्राचा पर्यावरणीय ठेवा अशी ओळख असलेल्या पश्चिम घाटाने आता राज्याला अजून एक अनोखी ओळख मिळवून दिलीय. पश्चिम घाटात आढळणा-या ब्लू मॉरमॉन या फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा देण्यात आलाय. ब्लू मॉरमॉन हे गडद निळ्या रंगाचं एक छानसं फुलपाखरू. पंखांवर खालच्या बाजून असलेल्या पांढ-या रंगामुळे आणि त्यावरच्या उठावदार काळ्या ठिपक्यांमुळे हे फुलपाखरू अतिशय गोंडस दिसतं.
                         राज्यात आढळणा-या या सुंदर फुलपाखराला आता राज्य सरकारने राज्य फुलपाखराचा दर्जा दिलाय. विशेष म्हणजे असा दर्जा देणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलंच राज्य ठरलंय.  ब्लू मॉरमॉन ह्या फुलपांखराला राज्य फुलपांखरू म्हणून घोषित करण्याचा निर्णय सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 22 जून रोजी झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र शासनातर्फे राज्याचे मानचिन्ह म्हणून राज्य प्राणी शेंगरू, राज्य पक्षी हरियल, राज्य वृक्ष आंबा व राज्य फुले जारूल घोषित केलेले आहे.
 महाराष्ट्र हे राज्य फुलपांखरू घोषित करणारे पहिले राज्य आहे.
  • आकाशगंगेला ख्रिस्तीयानो रोनाल्डोचे नाव :

शास्त्रज्ञांनी अलीकडेच शोधलेल्या एका नवीन आकाशगंगेला पोर्तुगालचा फूटबॉलपट्टू ख्रिस्तीयानो रोंनाल्डोच्या सन्मानार्थ सीआर-7 (कॉसमॉस रेडशिफ्ट-7) असे नाव देण्यात आले आहे.
ख्रिस्तीयानो रोंनाल्डोला सीआर-7 या नावानेही ओळखले जाते.

महत्वाचे जागतिक दिन

eMPSCKATTA

10 जानेवारी - जागतिक हिँदी दिन
_________________________________
26 जानेवारी - जागतिक सिमा शुल्क दिन
_________________________________
4 फेब्रुवारी- जागतिक कुष्ठरोग दिन
_________________________________
14 फेब्रुवारी - व्हँलेँटाईन डे
_________________________________
20 फेब्रुवारी- सामाजिक न्यायदिन/जागतिक सामाजिक स्वच्छता दिन.
_________________________________
21 फेब्रुवारी - जागतिक मातृभाषा दिन
_________________________________
8 मार्च - जागतिक महिला दिन
_________________________________
15 मार्च - जागतिक ग्राहक हक्क दिन
_________________________________