Post views: counter

Current Affairs Oct 2015 Part- 4



  • वीरेंद्र सेहवागने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या निवृत्तीचे संकेत :



                     भारताचा तुफानी फलंदाज वीरेंद्र सेहवागने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या निवृत्तीचे संकेत दिले आहेत. भारतात जाऊन अधिकृतरीत्या घोषणा करणार असल्याचे खुद्द सेहवागनेच दुबई येथे झालेल्या मास्टर्स चॅम्पियन्स लीग स्पर्धेच्या लाँचिंग दरम्यान स्पष्ट केले. वेगवान गोलंदाज झहीर खानच्या निवृत्तीनंतर सेहवागने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ भारतीय संघाबाहेर असलेल्या सेहवागने अखेरचा कसोटी सामना मार्च 2013 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध हैदराबादेत खेळला होता.

                    वीरू, नवाब ऑफ नजफगढ, सुल्तान ऑफ मुल्तान आणि जेन मास्टरऑफ मोर्डेन क्रिकेट या टोपणनावाने प्रसिध्द असलेला भारताचा स्फोटक सलामीवीर वीरेंदर सेहवागने अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेटसह इंडियन प्रिमियर लीगमधून (आयपीएल) निवृत्तीची औपचारीक घोषणा केली. आपल्या ३७ व्या वाढदिवसाच्या दिवशी सेहवागने टि्वटरच्या माध्यमातून निवृत्ती जाहीर केली.
Post views: counter

माहिती तंत्रज्ञान




                                 माहिती तंत्रज्ञान म्हणजे माहितीची निर्मिती, एकत्रीकरण, माहितीवर केलेली प्रक्रिया, साठा, माहितीची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी केलेली देवाणघेवाण या प्रक्रिया. माहिती तंत्रज्ञानामध्ये संगणक महत्त्वाची भूमिका पार पाडतो. माहिती तंत्रज्ञानामध्ये कच्च्या माहितीचे रूपांतर उपयोगी माहितीमध्ये केलेले असते. प्रक्रिया केलेल्या माहितीचे पुनर्चक्रीकरण केले जाते.
या माहितीचा संचय करून तिचा उपयोग दुसऱ्या प्रक्रियेसाठी केला जातो तसेच प्रक्रिया केलेली माहिती दुसऱ्या माहितीसाठी एकत्रित करून तिचा परिणाम वाढवता येतो. संचय केलेली माहिती नव्या स्वरूपात मिळू शकते. माहितीचे हे नवे स्वरूप समजण्यास सोपे असते.

आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका -

  1. व्हच्र्युअल रिअॅलिटी (आभासी सत्य) :  प्रत्यक्ष असावे तसे संगणकाच्या मदतीने तयार केलेले आणि वस्तुत: कृत्रिम असलेले सभोवतालचे वातावरण म्हणजेच आभासी सत्य. संगणकीय खेळांमध्ये याचा मोठय़ा प्रमाणावर उपयोग केला जातो. वैद्यक क्षेत्रातील संशोधनासाठी तसेच शिक्षण क्षेत्रातही याचा प्रभावी उपयोग केला जातो. जाहिरात क्षेत्रात ग्राहकांना आकर्षति करण्यासाठी याचा प्रभावीपणे उपयोग केला जातो.
  2. टेलिमेडिसिन : संपर्क तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान, जैव-वैद्यक अभियांत्रिकी आणि वैद्यकशास्त्र यांच्या एकत्रीकरणातून टेलिमेडिसिन विकसित झाले आहे. साधारणत: या तंत्रानुसार रुग्णाचा वैद्यकीय अहवाल तज्ज्ञ डॉक्टरांकडे पाठवला जातो.
Post views: counter

how to face PSI/STI/Asst pre exam ?


PSI/ STI /ASST  पूर्व परिक्षेला कसे सामोरे जाल ??



  • माझ्या मते तुम्ही जर खालील प्रमाणे प्रश्नपत्रिका सोडवण्या साठी वेळेचं नियोजन केलं तर तुम्ही ठरलेल्या वेळेत सर्व प्रश्न सोडवू शकाल.
  • 100 प्रश्न – सोडवण्यासाठी 60 मिनिटे असतात. साधारणपणे, खालीलप्रमाणे प्रश्न येतात त्या त्या विषयावर:

» अंकगणित व बुद्धिमापन - 15 प्रश्न
» भूगोल – 15 प्रश्न
» इतिहास – 15 प्रश्न
» विज्ञान – 15 प्रश्न
» नागरिकशास्त्र – 10 प्रश्न
» चालू घडामोडी – 15 प्रश्न
» अर्थव्यवस्था – 15 प्रश्न

तंतू प्रकाशशास्त्र-(Optical Fiber)




तंतू प्रकाशशास्त्र-(Optical Fiber):

                     ऑप्टिकल फायबर म्हणजे अत्यंत शुद्ध काचेचा तंतू. या तंतूचा व्यास अतिशय लहान असतो. अशा १००० तंतूंच्या जुडग्याचा व्यास एका मिलिमीटरपेक्षाही कमी असतो. सर्वसाधारणपणे एखाद्या संदेशाचे वहन करण्यासाठी त्याचे रूपांतर इलेक्ट्रिकल इम्पल्सेसमध्ये करून ते तांब्याच्या तारांमधून वहन केले जाते, जेव्हा अशा संदेशांचे रूपांतर प्रकाशलहरींमध्ये करून त्यांचे वहन काच किंवा प्लॅस्टिकच्या तंतूंमधून केले जाते, तेव्हा त्या तंत्रज्ञानाला तंतू प्रकाशशास्त्र असे म्हणतात. प्रकाशीय तंतूंमधून प्रकाशाचे वहन संपूर्ण अंतर्गत परावर्तन या तत्त्वांच्या आधारे होते. परंपरागत संदेशवहन व्यवस्थेपेक्षा फायबर ऑप्टिकल्सचा महत्त्वाचा फायदा म्हणजे हे तंतू केसाच्या आकाराचे असल्याने एका

कर्मवीर भाऊराव पाटील


बहुजन समाजापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवणारे आधुनिक भगीरथ आणि वटवृक्ष-रूप धारण केलेल्या रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक!

                    रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक भाऊराव पाटील यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावी झाला. सांगली जिल्ह्यातील ऐतवडे बुद्रुक हे त्यांचे मूळ गाव होय. लहानपणापासूनच भाऊराव बंडखोर होते. अन्यायाची त्यांना प्रचंड चीड होती. अस्पृश्यतेबद्दल त्यांच्या मनात राग होता. अस्पृश्य समाजातील लोकांना पाणी दिले जात नाही म्हणून त्यांनी एका विहीरीचा रहाटच मोडून टाकला होता. त्यांचे प्राथमिक शिक्षण सांगली जिल्ह्यातील विटा या गावी झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांना कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये दाखल करण्यात आले.