आणीबाणी:
काही विशिष्ट परिस्थितीला तोंड देण्यासाठी राष्ट्रपतीला काही विशेष स्वरूपाचे अधिकार देण्यात आले आहेत. संविधानाने खालील तीन प्रकारच्या आणीबाणीचा उल्लेख केला आहे.
- राष्ट्रीय आणीबाणी (३५२)
- घटकराज्यातील आणीबाणी (३५६)
- आर्थिक आणीबाणी (३६०)
स्पष्टीकरण :
- राष्ट्रीय आणीबाणी (३५२) :-
युद्ध किंवा बाह्य आक्रमण यामुळे भारताच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे किंवा अंतर्गत सशस्त्र उठावामुळे भारताच्या एकात्मतेला धोका निर्माण झाला आहे असे राष्ट्रपतीला वाटल्यास तो सर्व भारतासाठी किंवा भारतातील एखाद्या भागासाठी आणीबाणीची घोषणा करू शकतो. अशा त-हेच्या घोषणेला संसदेची एका महिन्याच्या आत मान्यता घ्यावी लागते.