Post views: counter

Current Affairs Sept 2016 Part- 4


#eMPSCkatta_Current_Affairs

🔹महाराष्ट्रातील वृक्षारोपणाची लिम्का बुकमध्ये नोंद

मुंबई- महाराष्ट्रामध्ये राबविण्यात आलेल्या वृक्षारोपण उपक्रमाअंतर्गत 1 जुलै रोजी 2 कोटी 80 लाख रोपे लावण्याच्या विक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे.


राष्ट्रीय विक्रम म्हणून लिम्का बुकमध्ये हा विक्रम नोंदविण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्याचे वन खाते आणि सामाजिक वनीकरण विभागाने संयुक्तपणे हा उपक्रम राबविला. यामध्ये 1 जुलै रोजी केवळ बारा तासांमध्ये 2 कोटी 81 लाख 38 हजार 634 रोपे लावण्यात आली. त्यामध्ये राज्यातील जनतेने उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. सर्वसामान्य नागरिकांसह, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था आणि इतर सरकारी, खासगी संस्था, संघटनांनी वृक्षारोपण केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विक्रमाची नोंद झाल्याचे ट्विटरवरून आज जाहीर केले आहे. पर्यावरण रक्षणासाठी हातभार लावल्याबद्दल वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, वन सचिव, शासकीय अधिकारी व राज्यातील नागरिकांचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले.


उल्लेखनीय बाबी -

सर्वाधिक म्हणजे 153 वृक्षांच्या प्रजाती लावल्या12 तासांत केले

 वृक्षारोपण एकावेळी 65,674 ठिकाणी

 वृक्षारोपण6 लाख 14 हजार 482 लोकांचा सहभाग

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹'महानदी'वरून ओडिशा-छत्तीसगड आमनेसामने

भुवनेश्‍वर - कावेरी नदीच्या पाणीवाटपावरून तमिळनाडू आणि कर्नाटकमधील संघर्ष शिगेला पोचला असताना, आता महानदीच्या पाण्यावरून छत्तीसगड आणि ओडिशा ही दोन राज्ये आमनेसामने आली आहेत.


या वादावर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय जलस्रोतमंत्री उमा भारती यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी झालेल्या
Post views: counter

संयुक्त महाराष्ट्र चळवळ

संयुक्त महाराष्ट्र चळवळ
स्वतंत्र भारतात मराठी भाषकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ हा लढा उभारला गेला. या चळवळीमुळे १ मे इ. स. १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले.
महाराष्ट्र राज्यात मराठी भाषा बोलणारे मुंबई, कोकण, देश, विदर्भ, मराठवाडा, खानदेश व अजूनही महाराष्ट्राबाहेरच असलेले डांग, बेळगाव, निपाणी, कारवार व बिदर हे भाग अभिप्रेत होते. साहित्यिक, सांस्कृतिक, वैचारिक, राजकीय या सर्व अंगानी ही चळवळ उभी राहिली.
 पूर्वार्ध 
                      ब्रिटिशांनी आपल्या राज्यकारभारासाठी भारताची विभागणी वेगवेगळ्या प्रांतात केली होती परंतु ती भाषेप्रमाणे नव्हती. इ. स. १९२० रोजी नागपुरात झालेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या वेळी भाषावर प्रांतरचेनेचा मुद्दा महात्मा गांधींनी मान्य केला होता.लोकमान्य टिळक हे देखील भाषावर प्रांतरचनेच्या बाजूने होते. काँग्रेसनेच एकेकाळी मान्य केलेला हा मुद्दा स्वातंत्र्यानंतर मात्र पक्षाला ,विशेषत: नेहरुंना , संकुचित व राष्ट्रीय एकात्मकतेला धोका वाटू लागला.मुंबईतील भांडवलदारांना जे मुख्यत: अमहाराष्ट्रीय होते, त्यांचा मुंबई महाराष्ट्राला द्यायला कडाडून विरोध होता.संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा पाया इ. स. १९३८ च्या अखेर वऱ्हाडात घातला गेला. त्या वेळी वऱ्हाडचा प्रदेश जुन्या मध्यप्रांत व वऱ्हाड (सी. पी. अँड बेरार प्रॉव्हिन्स) प्रांतात समाविष्ट होता. त्यात बहुसंख्या हिंदी भाषिकांची होती. वऱ्हाडातून येणारे उत्पन्न अधिकतर हिंदी विभागावर खर्च होऊनही वऱ्हाड दुर्लक्षिलेला राही.त्यामुळे त्यातून मराठी वऱ्हाड वेगळा करण्याची मागणी चालू शतकाच्या प्रारंभीपासून व्हाइसरॉयच्या कौन्सिलात होत होती. इ. स. १९३५ साली प्रांतिक स्वायत्ततेचा कायदा पास झाला.इ. स. १९३७च्या निवडणुकीत प्रांतिक विधिमंडळात काँग्रेसला बहुमत लाभले.विधिमंडळाचे सदस्य रामराव देशमुख यांनी १ ऑक्टोबर इ. स. १९३८ रोजी त्या विधिमंडळापुढे मांडलेला वेगळ्या वऱ्हाडाचा ठराव एकमताने मंजूर झाला.

पृथ्वीची कंपनशक्ती

पृथ्वीची कंपनशक्ती



                               काही आठवडय़ांपूर्वी मणिपूर येथे मोठा भूकंप झाला. या धरणीकंपात जरी फार मोठी वित्तहानी झाली असली तरी फारशी जीवितहानी झाली नाही. भूकंप प्रभाव क्षेत्रात फार मोठी लोकसंख्या अस्तित्वात नव्हती ही एक जमेची बाजू होती. भूकंपांची संख्या सद्या वाढताना दिसत आहे व त्याच्या धक्क्याने जीवित व वित्तहानीही वाढताना दिसत आहे. धरणीकंपनाने निसर्ग आपली शक्ती किती तीव्र आहे हे सप्रमाण दाखवून देत आहे.

                             EARTHORBITमानवाची उत्पत्ती होऊन लाखो र्वष झाली असली तरी निसर्गाच्या ज्या काही गतिकीय प्रक्रिया सुरू आहेत त्याचा उलगडा अजूनही मानवाला झालेला नाही. या क्रिया-प्रक्रियांचा आलेख आपण काही शतकांपासून जमा करत आहोत; पण आतापर्यंत साठवलेली माहिती फार अपुरी आहे. या माहितीच्या आधारे या नैसर्गिक घडामोडींचा आलेख अचूकपणे मांडणे फार कठीण काम आहे. पण जी माहिती आपण आतापर्यंत जमा केलेली आहे. ती एका प्रकारे जिगसॉ पझलसारखी आहे. काही रकाने योग्य प्रकारे भरले गेले आहेत, तर इतर खाली रकाने अजूनही भरावयाचे आहेत.
Post views: counter

Current Affairs September 2016 Part - 3

★|| 🇪🇲 🇵 🇸 🇨 🇰🇦 🇹 🇹🇦  ||★

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹‘डेटा ट्रॅफिक’ पाचपट होणार!

वेगाने वाढणारे फोरजी नेटवर्क आणि त्यात रिलायन्स जिओचे झालेले आगमन यांमुळे माहितीची वाहतूक अर्थात डेटा ट्रॅफिक वर्षअखेर पाचपट होईल, असा अंदाज भारतीय तंत्रज्ञान कंपनी असलेल्या 'इंडस ओएस'ने वर्तवला आहे.

इंडस ओएस ही स्मार्टफोनसाठी भारतीय भाषांमध्ये ऑपरेटिंग प्रणाली तयार करणारी कंपनी आहे. ही कंपनीच्या अंदाजानुसार, माहिती मिळवणे स्वस्त झाल्याने प्रत्येक ग्राहकाकडून दरमहिना एक जीबीपेक्षा अधिक माहिती वापरली जाणार आहे. जगात सरासरी दरमहिना ९५७ एमबी माहिती वापरली जाते. भारतात मात्र याच्या तुलनेत केवळ एक तृतीयांश माहिती वापरली जाते. आता हे प्रमाणा जिओच्या प्रवेशामुळे बदलणार आहे. यामुळे भारत हा २०२०पर्यंत जगातील टॉप १० मोबाइल डेटा ग्राहकांच्या पंक्तीत जाऊन बसेल.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹व्होडाफोन-बीएसएनल यांच्यात करार

सार्वजनिक क्षेत्रातील भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) आणि व्होडाफोन यांच्यात राष्ट्रीय स्तरावर 'टूजी इंटरसर्कल रोमिंग' करार करण्यात आला आहे. या करारामुळे दोन्ही कंपन्यांना आपल्या ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यास व कॉल ड्रॉपचे प्रमाण घटवण्यास मदत होणार आहे. करारानुसार दोन्ही कंपन्यांना एकमेकांचे टॉवरही वापरता येणार आहेत. देशात व्होडाफोनचे १ लाख ३७ हजार तर बीएसएनएलचे १ लाख १४ हजारपेक्षा अधिक टॉवर आहेत.

रिओ  पॅरालिंपिक २०१६ :-
दीपा मलिकला रौप्य:-
--------------------------------
* भारताच्या दीपा मलिक हिने रिओ येथे सुरू असलेल्या पॅरालिंपिक स्पर्धेत सोमवारी गोळाफेकीच्या एफ 53 प्रकारात ऐतिहासिक कामगिरीची नोंद करताना
Post views: counter

Current Affairs Sept 2016 Part-time 2


#eMPSCkatta_Current_Affairs

🔹द्राक्षांच्या " अर्ली' छाटणीचे तयार झालेत मणी

नाशिक - चिलीच्या द्राक्षांच्याअगोदर जगाच्या बाजारपेठेत द्राक्षे पोचावीत म्हणून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ऑक्टोबरच्या अगोदर छाटणीचे तंत्र विकसित केले आहे . त्यानुसार सटाणा, मालेगाव भागात छाटलेल्या बागांमध्ये सात ते आठ मिलिमीटर आकाराचे मणी तयार झाले आहेत. उरलेल्या भागामध्ये पुढील आठवड्यात " अर्ली' छाटणीला वेग येणार आहे . एकूण दीड लाख एकरांपैकी वीस टक्के क्षेत्रावर "अर्ली ' छाटणी केली जाते.
द्राक्षांच्या मालकाडी तयार करण्यासाठी एप्रिलमध्ये शेतकऱ्यांनी छाटणी केली होती . नेमक्या याच काळात बागांसाठी पाणी कमी पडले . त्यामुळे बागेतील काड्यांचा आकार बारीक राहिला आहे . त्यामुळे " अर्ली ' छाटणीतून पुरेसे मणी तयार होतील काय? अन् मणी तयार झाले तरीही ते टिकाव धरतील काय? या प्रश्नांची काळजी शेतकऱ्यांमध्ये दाटून आली आहे . गेल्या वर्षी एकूण उत्पन्नाच्या सर्वसाधारणपणे दहा टक्क्यांपर्यंत द्राक्षांची निर्यात शेतकऱ्यांनी पोचवली आहे . नाशिकची " अर्ली ' छाटणीची द्राक्षे मलेशिया, सिंगापूर, हॉंगकॉंग , थायलंड , अरब देशांमध्ये पाठवली जातात.

 ऑक्टोबर छाटणीची द्राक्षे युरोप , अरब देशांप्रमाणेच लंडन , चीन , रशियामध्ये निर्यात करण्यात येतात . जानेवारीपासून निर्यातीला वेग येतो . " अर्ली ' छाटणीमध्ये प्रामुख्याने काळ्या रंगाच्या आणि हिरव्या रंगाच्या थॉमसन वाणाच्या द्राक्षांच्या बागांचा समावेश मोठ्या प्रमाणात असतो.
बाजारपेठ विस्तारण्याची अपेक्षा
जगाच्या बाजारपेठेत दक्षिण आफ्रिकेतील द्राक्षांचा हंगाम संपत असतानाच चिली आणि भारतातील द्राक्षे पोचत असत . त्यामुळे भारतीय शेतकऱ्यांना स्पर्धा करणे कठीण बनले होते . त्यावर उपाय म्हणून शेतकऱ्यांनी स्वतः शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली " अर्ली ' छाटणीचे तंत्र विकसित केले आहे . प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा दर्जेदार द्राक्षांचे उत्पादन घेण्यात शेतकरी पारंगत झाले आहेत. आता शेतकऱ्यांना बाजारपेठ आणखी विस्तारित होण्याची अपेक्षा आहे . अमेरिका , ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड , जपानची बाजारपेठ उपलब्ध झाल्यास चार पैसे आणखी मिळण्यास मदत होईल , अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे . द्राक्ष बागायतदार संघाचे माजी अध्यक्ष अशोक गायकवाड यांनी "ऍपेडा ' कडे विस्तारित बाजारपेठेविषयीच्या मागण्या करण्यात आल्याची माहिती दिली .

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹भारतातील कुपोषणाची समस्या अद्याप गंभीर

कोलकाता - भारतातील कुपोषणाची भयावहता कमी झाली असली तरी दक्षिण आशियाई देशांशी तुलना करता अद्याप पोषणाबाबतची स्थिती समाधानकारक नाही , असे मत वरिष्ठ आहार रोगनिदान तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे .

" नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन' (एनआयएन ), " कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च ' या संस्थांचे माजी संचालक डॉ . बी. शशिकरण म्हणाले , "" भारतातील काही भाग वगळता कुपोषणाच्या स्थितीत निश्चितच सुधारणा झाली आहे . अपुऱ्या आहारामुळे खुरटेपणा व वजन