Post views: counter

Current Affairs October 2016 Part - 2

★|| 🇪🇲 🇵 🇸 🇨 🇰🇦 🇹 🇹🇦  ||★

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर पालघरमध्ये बाल उपचार केंद्र

मुंबई - मोखाडा, जव्हार तालुक्यांतील कुपोषणग्रस्त बालकांवर उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर आठ नवीन बाल उपचार केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ . दीपक सावंत यांनी आज येथे दिली .
कुपोषण निर्मूलन आणि कुपोषित बालकांच्या उपचाराबाबत आरोग्य विभागामार्फत करण्यात आलेल्या उपाययोजनांबद्दल माहिती देताना आरोग्यमंत्री म्हणाले , की पालघर जिल्ह्यात सध्या मोखाडा, विक्रमगड , वाडा, डहाणू येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये बाल उपचार केंद्रे कार्यान्वित आहेत. साधारण 20 खाटांचे हे उपचार केंद्र असून , उपजिल्हा जव्हार येथे पोषण व पुनर्वसन केंद्र सुरू आहे . त्या माध्यमातून कुपोषित बालकांवर उपचार सुरू आहेत.

जव्हार , मोखाडा तालुक्यांत आठ नवीन बाल उपचार केंद्रे या भागात सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला . जव्हार तालुक्यातील जामसर , साकूर , नांदगाव, साखरशेत येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये तर मोखाडा तालुक्यातील खोडाळा , आसे, मोऱ्हांडी, वशाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांत नवीन बाल उपचार केंद्रे कार्यान्वित करण्यात येतील .
याबरोबरच या भागातील कुपोषित बालकांच्या तपासणीसाठी बालरोग तज्ज्ञांमार्फत आठवड्यातून दोन वेळेस शिबिरे आयोजित केली जात आहेत. मनोर , पालघर , विक्रमगड , वाडा, तलासरी , मोखाडा , जव्हार येथे अशा प्रकारची शिबिरे आयोजित केली जात आहेत. बाल उपचार केंद्र, पोषण व पुनर्वसन उपचार केंद्र, व्हीसीडीसी आणि आरोग्य शिबिरांमध्ये तपासणी झालेल्या बालकांच्या घरी एएनएम, आशा , आरोग्य सेविका यांच्या माध्यमातून दररोज फेरतपासणी करण्याचे आदेश आरोग्यमंत्र्यांनी दिले आहेत. यात प्रामुख्याने आजाराची लक्षणे, वजन , उंची यांच्या साप्ताहिक नोंदी ठेवल्या जातील . या बालकांमध्ये होणाऱ्या साप्ताहिक बदलांच्या नोंदीदेखील ठेवल्या जाणार आहेत आणि त्यानुसार उपचार करण्याच्या सूचना आरोग्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹अपारंपरिक ऊर्जानिर्मिती वाढविण्याचे उद्दिष्ट

मुंबई - देशातील विजेच्या एकूण गरजेमध्ये अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा वाटा 2022 पर्यंत वाढवण्याचे केंद्र सरकारचे नियोजन आहे ; तर 2030 पर्यंत एकूण वीजपुरवठ्यात सौरऊर्जेचा 40 टक्के वाटा असेल, अशी माहिती केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांनी बडोदा येथील " स्वीच 2016 ' परिषदेत दिली .
Post views: counter

Current Affairs October 2016 Part 1

★|| 🇪🇲 🇵 🇸 🇨 🇰🇦 🇹 🇹🇦  ||★

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹मद्याच्या बाटलीवर सरकारी ' होलोग्राम'

बनावटीला आळा घालण्यासाठी मोबाईल ऍप , टोल फ्री क्रमांकाचे उद्घाटन
मुंबई - शौकिनांकडून रिचवल्या जाणाऱ्या देशी - विदेशी लाखो बाटल्यांमधील मद्य बनावट असण्याची शक्यता नाकारता येत नाही . हे टाळून मद्याची अस्सल गुणवत्तेचे प्रमाणपत्र म्हणून प्रत्येक बाटलीवर सरकारी " होलोग्राम' चिकटविण्याचे राज्य सरकारने ठरविले आहे . हे " होलोग्राम' सरकारी प्रेसमध्ये छापण्याचा विचार सरकार करीत आहे . या निर्णयामुळे वर्षाकाठी हजार ते बाराशे कोटींचा वाढीव महसूल विनासायास सरकारी तिजोरीत पडेल, असा दावा मंत्रालयातील सूत्रांनी व्यक्त केला आहे .

मद्याच्या बाटल्यांवर "होलोग्राम ' सक्तीचा करण्याचा निर्णय माजी उत्पादन शुल्क मंत्री एकनाथ खडसे यांच्या अल्पशा कारकिर्दीतच घेण्यात आला होता . तथापि , हा " होलोग्राम' खासगी कंपनीमार्फत निविदा काढून छापून घेण्याची योजना होती . दरम्यान , खडसे मंत्रिपदावरून पायउतार झाले आणि ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे या खात्याचा पदभार आला . " होलोग्राम' बाबतची काढली जाणारी निविदा रद्द करण्यात आली आणि नव्याने जागतिक निविदा काढण्याची सरकारने घोषणा केली . मात्र त्यामध्येही काही अडचणी आणि समस्या उद्भवू शकतात , असे सरकारी अधिकाऱ्यांच्या लक्षात आले आहे . खासगी कंपनीच्या मार्फत " होलोग्राम' छापून घेतले , तर त्यातही मद्य उत्पादक कंपन्या, वितरक यांच्यामध्ये साटेलोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही . सरकारचे नियंत्रण असले, तरीही त्यामुळे हा उपाय ही तितकासा परिणामकारक ठरत नाही .

अशाच प्रकारे "होलोग्राम' छपाई खासगी कंपनीला देऊन केरळ उत्पादन शुल्क विभागाने प्रयोग केला होता . मात्र त्यामध्ये मोठा गैरव्यवहार झाला होता . परदेशातून आयात केलेले मद्य , राज्यात व राज्याबाहेरून येणारे मद्य यातून सरकारला करापोटी कोट्यवधी रुपये मिळतात . वर्षाला हजार कोटींच्यावर महसूल " होलोग्राम' मुळे वाढणार आहे , असेही सूत्रांचे म्हणणे आहे . त्यामुळे होलोग्राम छपाई सरकारी प्रेसमध्येच करण्याचा सरकारचा विचार आहे . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लवकरच याबाबतीत सादरीकरण केले जाणार आहे , असे सूत्रांनी सांगितले .

" होलोग्राम ' म्हणजे काय ?
" होलोग्राम' हे असे तंत्रज्ञान आहे , की त्यामध्ये वस्तू , खाद्य - पेय , औषध अथवा इतर कोणतेही उत्पादन याची अस्सल गुणवत्ता राखण्यासाठी चिकटवलेला थ्रीडी ( त्रिमिती ) कागद चिकटवला जातो . विदेशात याबाबत जागरूकता आहे .

ऍप व टोल फ्री क्रमांकाचे उद्घाटन

राज्यातील बनावट विशेषतः हातभट्टीची दारू तयार करून त्यांची विक्री होते . तसेच मद्यनिर्मिती , वितरण, भेसळ आदी अनेक प्रकार होत आहेत. यासंदर्भात तक्रारी नोंदविण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने मोबाईल ऍप तयार केले आहे . 8422001133 या किंवा 18008333333 या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करण्याचे आवाहन केले आहे . त्याचे उद्घाटन रविवारी ( ता. 2) ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते मुंबईत होणार आहे . उत्पादन शुल्क आयुक्त व्ही . राधा आणि दक्षता संचालक अंमलबजावणी सुनील चव्हाण यांची ही संकल्पना आहे .

भरारी पथकाची कामगिरी

गुन्हे नोंद - 16353 ,
अटक आरोपी - 7247
मुद्देमालाची किंमत - 25 कोटी 23 लाख 90 हजार

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹भारत - चीनच्या सहकार्यावरच आशियाचे भवितव्य अवलंबून - नरेंद्र मोदी

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज चीनच्या नागरिकांना 67 व्या राष्ट्रीय दिनानिमित्त आज शुभेच्छा देत भारत आणि चीन यांच्या परस्पर सहकार्यांच्या जोरावरच आशियात शांतता आणि स्थिर भविष्य प्रस्थापित होईल .

चीनच्या लोकप्रिय मायक्रोब्लॉग वाईबो मोदी यांनी शुभेच्छा देत म्हटले, की भारत - चीन संबंध अनेक काळापासून आहेत . त्यात अध्यात्मक , शिक्षण , कला , व्यापार आणि परस्परांच्या सभ्यतेचा आदर करणे

Current Affairs Sept 2016 Part 5


#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹आश्विनच्या 37 कसोटींमध्येच 200 विकेट्स

कानपूर : अफलातून सूर गवसलेला ऑफस्पिनर रविचंद्रन आश्विनने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी आज ( रविवार ) वकार युनूस आणि डेनिस लिली या महान गोलंदाजांचा विक्रम मोडला . सर्वांत कमी कसोटी सामन्यांमध्ये 200 बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत आश्विनने वकार आणि लिली यांना मागे टाकले. या यादीत आश्विन आता दुसऱ्या क्रमांकावर आहे .

न्यूझीलंडविरुद्धचा सामना सुरू होण्यापूर्वी आश्विनचे कसोटीमध्ये 193 बळी होते . या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी आश्विनला एकही विकेट मिळाली नाही . पण तिसऱ्या दिवशी आश्विनने चार फलंदाजांना बाद केले. त्यानंतर आज न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावातही आश्विनने आतापर्यंत तीन बळी मिळविले आहेत. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनला बाद करत आश्विनने कसोटीतील 200 बळींचा टप्पा गाठला . ही आश्विनची 37 वी कसोटी आहे . वकार युनूस आणि डेनिस लिली या दोघांनीही 38 कसोटींमध्ये 200 बळी मिळविण्याची कामगिरी केली होती . सर्वांत कमी कसोटींमध्ये 200 बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत ऑस्ट्रेलियाचा माजी लेगस्पिनर क्लॅरी ग्रिमेट अव्वल स्थानी आहेत . त्यांनी 36 कसोटींमध्ये ही कामगिरी केली होती .

आर . आश्विनची कामगिरी :
कसोटी : 37 सामन्यांत 200* बळी
वन - डे : 102 सामन्यांत 142 बळी
ट्वेंटी - 20 : 45 सामन्यांत 52 बळी

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹व्याघ्र संरक्षणासाठी भारताचे महत्त्वपूर्ण पाऊल

नेक कॉलर , ड्रोननिर्मिती आता भारतात होणार

नवी दिल्ली - छुपी शिकार, अवयवांची तस्करी यांमुळे लुप्त होत चाललेल्या वाघांच्या संरक्षणासाठी भारत सरकारकडून ठोस पावले उचलली जात आहेत. त्यांच्या

Current Affairs Sept 2016 Part- 4


#eMPSCkatta_Current_Affairs

🔹महाराष्ट्रातील वृक्षारोपणाची लिम्का बुकमध्ये नोंद

मुंबई- महाराष्ट्रामध्ये राबविण्यात आलेल्या वृक्षारोपण उपक्रमाअंतर्गत 1 जुलै रोजी 2 कोटी 80 लाख रोपे लावण्याच्या विक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे.


राष्ट्रीय विक्रम म्हणून लिम्का बुकमध्ये हा विक्रम नोंदविण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्याचे वन खाते आणि सामाजिक वनीकरण विभागाने संयुक्तपणे हा उपक्रम राबविला. यामध्ये 1 जुलै रोजी केवळ बारा तासांमध्ये 2 कोटी 81 लाख 38 हजार 634 रोपे लावण्यात आली. त्यामध्ये राज्यातील जनतेने उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. सर्वसामान्य नागरिकांसह, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था आणि इतर सरकारी, खासगी संस्था, संघटनांनी वृक्षारोपण केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विक्रमाची नोंद झाल्याचे ट्विटरवरून आज जाहीर केले आहे. पर्यावरण रक्षणासाठी हातभार लावल्याबद्दल वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, वन सचिव, शासकीय अधिकारी व राज्यातील नागरिकांचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले.


उल्लेखनीय बाबी -

सर्वाधिक म्हणजे 153 वृक्षांच्या प्रजाती लावल्या12 तासांत केले

 वृक्षारोपण एकावेळी 65,674 ठिकाणी

 वृक्षारोपण6 लाख 14 हजार 482 लोकांचा सहभाग

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹'महानदी'वरून ओडिशा-छत्तीसगड आमनेसामने

भुवनेश्‍वर - कावेरी नदीच्या पाणीवाटपावरून तमिळनाडू आणि कर्नाटकमधील संघर्ष शिगेला पोचला असताना, आता महानदीच्या पाण्यावरून छत्तीसगड आणि ओडिशा ही दोन राज्ये आमनेसामने आली आहेत.


या वादावर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय जलस्रोतमंत्री उमा भारती यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी झालेल्या
Post views: counter

संयुक्त महाराष्ट्र चळवळ

संयुक्त महाराष्ट्र चळवळ
स्वतंत्र भारतात मराठी भाषकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ हा लढा उभारला गेला. या चळवळीमुळे १ मे इ. स. १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले.
महाराष्ट्र राज्यात मराठी भाषा बोलणारे मुंबई, कोकण, देश, विदर्भ, मराठवाडा, खानदेश व अजूनही महाराष्ट्राबाहेरच असलेले डांग, बेळगाव, निपाणी, कारवार व बिदर हे भाग अभिप्रेत होते. साहित्यिक, सांस्कृतिक, वैचारिक, राजकीय या सर्व अंगानी ही चळवळ उभी राहिली.
 पूर्वार्ध 
                      ब्रिटिशांनी आपल्या राज्यकारभारासाठी भारताची विभागणी वेगवेगळ्या प्रांतात केली होती परंतु ती भाषेप्रमाणे नव्हती. इ. स. १९२० रोजी नागपुरात झालेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या वेळी भाषावर प्रांतरचेनेचा मुद्दा महात्मा गांधींनी मान्य केला होता.लोकमान्य टिळक हे देखील भाषावर प्रांतरचनेच्या बाजूने होते. काँग्रेसनेच एकेकाळी मान्य केलेला हा मुद्दा स्वातंत्र्यानंतर मात्र पक्षाला ,विशेषत: नेहरुंना , संकुचित व राष्ट्रीय एकात्मकतेला धोका वाटू लागला.मुंबईतील भांडवलदारांना जे मुख्यत: अमहाराष्ट्रीय होते, त्यांचा मुंबई महाराष्ट्राला द्यायला कडाडून विरोध होता.संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा पाया इ. स. १९३८ च्या अखेर वऱ्हाडात घातला गेला. त्या वेळी वऱ्हाडचा प्रदेश जुन्या मध्यप्रांत व वऱ्हाड (सी. पी. अँड बेरार प्रॉव्हिन्स) प्रांतात समाविष्ट होता. त्यात बहुसंख्या हिंदी भाषिकांची होती. वऱ्हाडातून येणारे उत्पन्न अधिकतर हिंदी विभागावर खर्च होऊनही वऱ्हाड दुर्लक्षिलेला राही.त्यामुळे त्यातून मराठी वऱ्हाड वेगळा करण्याची मागणी चालू शतकाच्या प्रारंभीपासून व्हाइसरॉयच्या कौन्सिलात होत होती. इ. स. १९३५ साली प्रांतिक स्वायत्ततेचा कायदा पास झाला.इ. स. १९३७च्या निवडणुकीत प्रांतिक विधिमंडळात काँग्रेसला बहुमत लाभले.विधिमंडळाचे सदस्य रामराव देशमुख यांनी १ ऑक्टोबर इ. स. १९३८ रोजी त्या विधिमंडळापुढे मांडलेला वेगळ्या वऱ्हाडाचा ठराव एकमताने मंजूर झाला.