Post views: counter

Current Affairs December 2016 Part 2


#eMPSCkatta_Current_Affairs

🔹उपेक्षित नोबेल विजेत्याचा पाक पुन्हा सन्मान करणार

इस्लामाबाद - सुमारे 36 वर्षांपूर्वी ज्या व्यक्तीने पाकिस्तानला पहिले नोबेल मिळवून दिले आणि आजतागायत पाकिस्तान त्या उपेक्षित व्यक्तीचा तिरस्कार करत होता , त्या व्यक्तीचा पाकिस्तान आता सन्मान करणार आहे .

पाकिस्तानमधील कायदे ए आझम विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाला भौतिकशास्त्रज्ञ नोबेल पुरस्कार विजेते प्रोफेसर दिवंगत अब्दुस सलाम यांचे नाव देण्याची योजना तयार केली जात आहे . गेल्या तीन दशकांपासून पाकिस्तान या शास्त्रज्ञाच्या योगदानाकडे दुर्लक्ष करत होते कारण ते अहमदी समाजातील होते. पाकिस्तानच्या कायद्यानुसार अहमदी नागरिकांना स्वत : ला मुसलमान म्हणण्याचा अधिकार नाही. सलाम हे केवळ पहिले पाकिस्तानी नाही तर नोबेल जिंकणारे ते पहिले मुस्लिम होते. मात्र , अहमदिया मुसलमान असल्याने पाकिस्तान त्यांना मुस्लिम मानत नव्हते . मात्र , पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या कार्यालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले , की इस्लामाबादच्या कायदे ए आझम विद्यापीठाच्या नॅशनल सेंटर फॉर फिजिक्स या विभागाला सलाम यांचे नाव देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे . पंतप्रधानांनी शिक्षण मंत्रालयालादेखील औपचारिक प्रस्ताव करण्याचे निर्देश दिले असून , जेणेकरून पाकिस्तानच्या अध्यक्षांची परवानगी घेतली जाईल .

अब्दुस सलाम यांना नोबेल
अब्दुस सलाम यांना 1979 मध्ये शेल्डन ग्लाशो आणि स्टिव्हन वाइनबर्ग यांच्यासह संयुक्तपणे भौतिकशास्त्रातील नोबेल देण्यात आले होते . देवकण शोधण्याचा मार्ग त्यांनी शोधून काढला होता आणि हा शोध शंभर वर्षांतील सर्वांत मोठे यश मानले जात होते . मात्र , पाकिस्तानने आजपर्यंत या संशोधनाची कधीही कदर केली नाही . एवढेच नाही तर पाकिस्तानातील कट्टरपंथीयाच्या दबावामुळे नोबेलविजेते असूनही आपल्या कार्यकाळात त्यांना विद्यापीठात अध्यापनाचे कार्यदेखील करू दिले नाही . 1974 मध्ये एका कायदा करून अहमदियांना मुस्लिमेतर म्हणून जाहीर केले होते . 1984 साली पुन्हा एकदा कायदा तयार करण्यात आला आणि त्यानुसार जर एखादा अहमदी स्वत : ला मुस्लिम म्हणत असेल तर त्याला तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते . त्यामुळे अब्दुस यांचा शोध आयुष्यभर पाकिस्तानात दुर्लक्षित राहिला .

 पाकिस्तानातील रबाव शहरात अब्दुस सलाम यांना दफन केलेले आहे . या शहरात अहमदी नागरिकांची संख्या लक्षणीय आहे . त्यांच्या कबरीवर नोबेल जिंकणारे पहिले मुसलमान असा उल्लेख करण्यात आला होता ; परंतु अधिकाऱ्यांनी मुसलमान हा शब्द खोडून काढला.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹इस्रोच्या 'रिसोर्ससॅट-२ए' चे यशस्वी प्रक्षेपण

भारतीय अवकाश संशोधन संस्था - इस्रोने आज सतीश धवन अवकाश केंद्रातून रिमोट सेंसिंग उपग्रह रिसोर्ससॅट-२ए चे यशस्वी प्रक्षेपण केले. सकाळी १०.२४ वाजता पीएसएलव्ही-सी३६ च्या मदतीने इस्रोने हा उपग्रह अंतराळात सोडला. हा रिसोर्ससॅट-१ आणि २ च्या

Current Affairs December 2016 Part 1


#eMPSCkatta_Current_Affairs

🔹‘ ओबीसीं ’मध्ये १५ जातींचा समावेश

नवी दिल्ली - केंद्रीय ओबीसी यादीमध्ये महाराष्ट्रासह आठ राज्यांमधील १५ नव्या जातींचा समावेश करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने आज घेतला . त्याचबरोबर मुंबई वाहतूक प्रकल्पाच्या ( एमयूटीपी ) तिसऱ्या टप्प्यालाही मंजुरी देण्यात आली . याशिवाय पाकव्याप्त काश्मीरमधील निर्वासितांसाठी केंद्र सरकारने आज दोन हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले . पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ बैठकीत हे निर्णय झाले .

राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाने ( एनसीबीसी ) केलेल्या शिफारशीनुसार केंद्रीय ओबीसी यादीमध्ये समावेशांसाठी २४७९ जातींबद्दलची अधिसूचना केंद्र सरकारने सप्टेंबरमध्ये केली होती . यामध्ये नामसाधर्म्य असलेल्या जाती , उपजातीदेखील आहेत. परंतु , यादरम्यान महाराष्ट्रासोबतच आसाम, बिहार , हिमाचल प्रदेश , झारखंड , मध्य प्रदेश , जम्मू आणि काश्मीर तसेच उत्तराखंड या राज्यांकडून जवळपास २८ बदल करण्याची मागणी झाली . या यादीमध्ये १५ नव्या जाती , नऊ नामसाधर्म्य असलेल्या जाती , उपजाती आणि चार दुरुस्त्यांचा समावेश आहे . केंद्राच्या सुधारित अधिसूचनेनंतर या जातींना शिष्यवृत्ती त्याचप्रमाणे सरकारी नोकऱ्या , शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षणाचे लाभ मिळतील.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹‘एमयूटीपी ’ साठी दहा हजार कोटी

महाराष्ट्रातील मुंबईसह ठाणे , पालघर, आणि रायगड या चार जिल्ह्यांना लाभ पोचविणाऱ्या मुंबई शहरी वाहतूक प्रकल्पाच्या ( एमयूटीपी ) तिसऱ्या टप्प्याला केंद्रीय मंडळाने मान्यता दिली आहे . मुंबईतील वाहतुकीसाठी महत्त्वाचा असलेला ‘एमयूटीपी टप्पा ३ ’ येत्या पाच वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित असून त्यासाठी अंदाजे १० ,९४७ कोटी रुपये खर्च येऊ शकतो. याअंतर्गत पश्चिम रेल्वेच्या विरार -डहाणू रोड यादरम्यान अतिरिक्त दुहेरी मार्ग तयार करण्याच्या प्रस्तावाला होकार मिळाला आहे . यामुळे चर्चगेट ते डहाणू रोड उपनगरीय रेल्वे वाहतूक सेवेचा विस्तार होणार आहे . पश्चिम रेल्वेचा सर्वाधिक वर्दळीचा विरार ते डहाणू दरम्यानचा मार्ग मुंबई -अहमदाबाद व दिल्ली या प्रमुख रेल्वे मार्गाचा हिस्सा आहे .

याशिवाय , पनवेल- कर्जत या मार्गाच्या दुहेरीकरणाचीही यात तरतूद आहे . यामुळे पनवेल मार्गे कर्जत ते छत्रपती शिवाजी टर्मिनस ( सीएसटीएम ) हा मार्ग सुरू होणार आहे . कल्याण मार्गे कर्जत ते छत्रपती शिवाजी टर्मिनस या विद्यमान मार्गापेक्षा हे अंतर २३ किलोमीटरने कमी होणार असून , धीम्या लोकलचा प्रवास ३५ ते ४० मिनिटांनी कमी होईल . कल्याणहून वाशी किंवा पनवेल ला जाणाऱ्या प्रवाशांना ठाण्याला उतरून हार्बर लाइनने उलटा प्रवास करावा लागतो . परिणामी ठाणे स्थानकावर प्रवाशांची गर्दी असते . ऐरोली -कळवा कॉरिडॉरमुळे प्रवाशांना ठाण्याला उतरण्याची गरज भासणार नाही .

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹ज्येष्ठ समाजसेविका सुलभा ब्रह्मे यांचं निधन

जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, थोर विदुषी व अर्थतज्ज्ञ प्रा. सुलभा ब्रह्मे यांचं आज पुण्यातील राहत्या घरी निधन झालं. त्या ९० वर्षांच्या होत्या. पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांच्या त्या भगिनी होत.
Post views: counter

Yojana योजना मासिक 2016

Yojana योजना मासिक 2016

Yojana Magezine

    1.
    January 2016
    2.
    February 2016
    3.
    March 2016
    4.
    April 2016
    5.
    May 2016
    6.
    June 2016
    7.
    July 2016
    8.
    August 2016
    9.
    September 2016
    10.
    October 2016
    11.
    November 2016
    12.
                December 2016
    Post views: counter

    Join us on Telegram




    Hi friends ,

    For our daily updates pls join our Telegram channel.

    To join first download Telegram app then click on following link , and click on JOIN option which is in the bottom of the channel.

    Click here : https://Telegram.me/empsckatta

    This is for Telegram support.
    Post views: counter

    PSI पूर्व परीक्षेची तयारी कशी करावी ?



    नमस्कार मित्रहो,

    गेली 2 वर्षे चातकाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक ( PSI ) पदाच्या जाहिरातीची वाट बघणाऱ्या विध्यार्थ्यांना आयोगाने PSI ची जाहिरात काढून दिलासा दिला आहे, तरी आपण सर्वजण हि मिळालेली संधी न दवडता वेळेचे उपयुक्त नियोजन करून या संधीचे सोने कराल अशी अपेक्षा करतो, यश मिळो न मिळो हा पुढचा भाग आहे पण आपल्याकडून 110% प्रयत्न करणे हे आपले काम आहे.
    -------------------------------------------------
    -------------------------------------------------
    आपल्या या यशस्वी वाटचालीत आम्हालाही सामील व्हायला आवडेल , या वाटेवर आम्ही आपणास अगदी शेवटपर्यंत साथ देऊ, आणि याचाच एक भाग म्हणून हा आमचा अल्पसा प्रयत्न....