राज्यव्यवस्थेवर दरवर्षी साधारणत: ८ ते १० गुणांसाठी प्रश्न विचारले जातात. वस्तुत: हा घटक राज्यसेवेची परीक्षा पात्र होऊन शासकीय अधिकारी बनू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी परिचयाचा असतो. कारण राज्यघटना व राज्यव्यवस्थेसंबंधी कुतूहल असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये याविषयी जाणून घेण्याची इच्छा निर्माण होते आणि विद्यार्थी लोकसेवा आयोगाच्या परीक्षांकडे आकर्षति होतो.स्वाभाविकच विद्यार्थी भारतीय राज्यव्यवस्थेचा पाया असलेली राज्यघटना नेमकी कशा स्वरूपाची आहे? राज्यघटनेत नेमके काय अंतर्भूत आहे? घटनेत सार्वजनिक प्रशासनासंबंधी नेमक्या कोणत्या तरतुदी आहेत? यापासून ते राज्यघटनेचा प्रत्यक्ष व्यवहार कसा झाला? त्या व्यवहाराची सद्य:स्थिती काय आहे? आणि भवितव्य काय? अशा आव्हानात्मक प्रश्नांची उत्तरे शोधू लागतो. त्यातूनच विद्यार्थ्यांचे या घटकाचे अकलन वाढते. एकाअर्थी स्पर्धा परीक्षार्थीसाठी हा घटक जिव्हाळय़ाचा ठरतो. परिणामी पकीच्या पकी गुण प्राप्त करून देणारा घटक म्हणून याचा विचार करता येतो. किंबहुना प्रत्येक परीक्षार्थीने यादृष्टीनेच याचा विचार करावा.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यघटना व राज्यव्यवस्था या घटकाचा अभ्यासक्रम सविस्तरपणे नमूद केला आहे. यात भारतीय राज्यघटनेचा उगम, निर्मिती, स्वरूप व वैशिष्टय़े; मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे व मूलभूत कर्तव्ये; केंद्रीय कार्यकारी मंडळ व कायदेमंडळ; राज्य कार्यकारी मंडळ व कायदेमंडळ; न्यायव्यवस्था; महत्त्वाची घटनात्मक पदे आणि निवडणूक प्रक्रिया, राजकीय पक्ष व दबावगट या प्रमुख
