Post views: counter

Current Affairs September 2016 Part - 1


#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹आता ' एटीएम 'मधून नोंदवा मोबाईल क्रमांक

 कोणत्याही बॅंकेच्या "एटीएम ' मधून ग्राहकांना त्यांचा मोबाईल क्रमांक नोंद करण्याची सुविधा देण्याच्या सूचना रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने सर्व बॅंकांना दिल्या आहेत .

अलिकडच्या काळात बॅंकिंग व्यवहारासाठी मोबाईल क्रमांक महत्त्वाचा ठरत आहे . आपला मोबाईल क्रमांक नोंद करण्यासाठी ग्राहकांना पूर्वी त्यांच्या मूळ शाखेत जाणे गरजेचे होते . मात्र त्यानंतर कोणत्याही शाखेत मोबाईल क्रमांक नोंदविण्याची सुविधा देण्यात आली . आता आरबीआयने कोणत्याही बॅंकेच्या एटीएममधून ग्राहकांना मोबाईल क्रमांक नोंदविण्याची सुविधा देण्याच्या सूचना बॅंकांना केल्या आहेत. शिवाय इंटरनेट बॅंकिंगद्वारेही मोबाईल क्रमांक नोंदविण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आता केवळ मोबाईल क्रमांक नोंदणीसाठी बॅंकेच्या शाखेत जाण्याची गरज उरणार नाही .

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹हडप्पाकालीन ' धोलविरा' बंदर त्सुनामीमुळे नष्ट ?

" एनआयओ' चे संशोधन ; नगररचनेचा नव्याने अभ्यास

पणजी - गुजरातमधील अतिप्राचीन हडप्पाकालीन धोलविरा हे बंदर त्सुनामीमुळे नष्ट झाले असावे , असा कयास "सीएसआयआर - नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशियानोग्राफी '(एनआयओ ) या संस्थेतील संशोधकांनी व्यक्त केला आहे . "धोलविरा ' हे बंदर प्राचीन नगररचनेचा आदर्श नमुना म्हणून ओळखले जाते. त्या काळी त्सुनामी हे सामान्य संकट होते , त्सुनामीच्या अक्राळविक्राळ लाटांनीच धोलविराचा बळी घेतला असावा, असे तज्ज्ञांचे मत आहे .
Post views: counter

Current Affairs Aug 2016 Part - 5


#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹हत्तींसाठी 2 किलोमीटरची भिंत पाडण्याचे आदेश

 काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातील हत्तींच्या मार्गात अडथळा ठरणारी तब्बल दोन किलोमीटर अंतराची एका खाजगी कंपनीची भिंत पाडण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिले आहेत.

नैसर्गिकरित्या आसाममध्ये विस्थापित होणाऱ्या हत्तींच्या मार्गात एक 2. 2 किलोमीटर अंतराची भिंत अडथळा ठरत होती . नुमालिगड रिफायनरी लिमिटेड ( एनएफएल) या कंपनीची ही भिंत 2011 साली बांधण्यात आली होती . या भिंतीमुळे हत्तीचे एक पिल्लू मृत्युमुखी पडले होते. भिंत बांधल्यानंतर चार वर्षांची वन विभागाने वन संरक्षण कायद्याचा भंग करून ही भिंत बांधण्यासाठी जागा दिल्याचे म्हणत हरकत घेतली . होती . यावर हरित लवादाने परवानगी नसताना अविकसन क्षेत्रामध्ये ( नो डेव्हलपमेंट झोन ) भिंत उभारल्याने ती पाडण्याचे आदेश दिले आहेत. तसेच एनएफएलला 25 लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे .

Join your all friends @ChaluGhadamodi

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹भारताचा दीपोत्सव अमेरिकेत टपाल तिकिटावर

न्यूयॉर्क - अमेरिकेतील भारतीयांचा दिवाळीचा आनंद यंदा द्विगुणित होणार आहे . याचे कारण म्हणजे दिव्यांच्या या उत्सवाचे प्रतिबिंब टपाल तिकिटातून उमटणार आहे .
Post views: counter

Current Affairs Aug 2016 Part -3


चालू घडामोडी:-
---------------------------------
१) गुजरात भाजपा ने----------------------- यांना गुजरात चे नवीन मुख्यमंत्री म्हणून निवड केली:- विजय रूपाणी

२) 23 वां राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार ------------ यांना जाहीर झाला - शुभा मुदगल

३) -------------------- या भारतीय महिलेचीप्रथमच अंतरराष्ट्रीय ओलंपिक समिति चे सदस्य म्हणून निवड केली - टीना अंबानी

४) रियो-डि-जेनेरो येथे सुरूअसलेली---------------- व्या क्रमांकाची स्पर्धा - 3 वी

५) रियो ओलंपिक स्पर्धेत भाग घेणारी सर्वात कमी वयाची खेळाडू --- यादेशाचीआहे:- गौरिका सिंह (नेपाळ वय:- १३वर्ष)

६) नेपाळ चे प्रधानमंत्री म्हणून ---------------- यांची आत्ताच निवड करण्यात आली :- पुष्प कमल दहल/प्रचंड

७)2014-15 पर्यटन पुरस्कारामध्ये सर्वश्रेष्ठ राज्यचा पुरस्कार ------------ याला जाहीर झाला:- मध्य प्रदेश

८) ‘आर डी बर्मनिया: पंचमेमोयर्स’ या पुस्तकाचे लेखक:- चैतन्य पादुकोण

९) भारतीय महिला क्रिकेट टीम ची उप-कप्तान हरमनप्रीत कौर ------------ या देशाची ‘महिला बिग बैश टी-20 लीग’ ही स्पर्धा खेळणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटरबनली:- ऑस्ट्रेलिया

१०) इंडिया राइजिंग: फ्रेश होप, न्यू फीयर्स’ या पुस्तकाचे लेखक:- रवि वेल्लूर
११) प्रो-कबड्डी सीज़न-4 चा विजेता:- पटना पायरेट्स

१२) न्यायमूर्ति दिलीप बाबा साहेब भोसले ने ---------- याउच्च न्यायालयाच्या के मुख्य न्यायाधीश पदाची शपथघेतली:- अलाहाबाद उच्च न्यायालय

१३) ऑक्टोंबर २०१६ मध्ये होणाऱ्या कबड्डी विश्वकप स्पर्धेचे आयोजन कोणत्या देशामध्ये होणारआहे:- भारत

१४) चिंधी रॅग्स टू रिचेस आणी विदाऊट फायरिंग सिंगल बुलेट’ या पुस्तकाचे ---- हे लेखक :-ज्योतिर्मय डें(जे.डे.)

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹मराठीप्रश्नी गोवा सरकारची डबलगेम

मराठीला राजभाषेचा दर्जा द्यावा असा डिचोलीचे अपक्ष आमदार नरेश सावळ यांनी मांडलेला खासगी ठराव शुक्रवारी विधानसभेत सर्वानुमते संमत झाला तरी मराठी राजभाषेचा प्रश्न संपलेला नाही. केवळ
Post views: counter

Current Affairs Aug 2016 Part - 4


महत्वाचे:-
* केरळ राज्याने देशातील प्रथमच फॅट टॅक्स लागू केलाआहे.बर्गर , पिझा. सारख्या खाद्य पदार्थावर १४.५%  फॅट टॅक्स

* सुशीला कार्की नेपाळ ची पहिली महिला मुख्य न्यायाधीश

* राधिका मेनन पुरस्कार IMO (International Meritime Organisation) जिंकणारी जगातील पहिली  महिला

* केंद्र सरकानेबिहारच्यामोतीहारी(पूर्वचम्पारण) येथे कृषी व डेअरी विकास केंद्राची स्थापना

* नीती आयोगाने पंतप्रधान कार्यालयाला एक२० पाणी दस्तऐवज सादर केला आहे ज्यानुसार रेल्वे अर्थसंकल्प सादर करण्याची परंपरा समाप्त करावी अशी शिफारस करण्यात आली

* जीएसटी विधेयक एकमताने मंजूर करणारे आसाम  हे देशातील पहिले राज्य ठरले

* जागतिक आर्थिक मंच च्या २०१६ या वर्षातील वार्षिक बैठकीची  चौथी औद्योगिक क्रांती  ही थीम होती

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹प्रतिष्ठित औषध कंपन्यामध्ये भारत आघाडीवर

ब्लूबाइट्स या संस्थेने टीआरए रिसर्च या संस्थेबरोबर केलेल्या सर्वेक्षणानुसार जगातील प्रतिष्ठित औषध कंपन्यामध्ये भारतीय कंपन्या आघाडीवर आहेत.
‘इंडियाज् मोस्ट रेप्युटेड ब्रँड्स’ असे या सर्वेक्षण अहवालाचे नाव आहे.
सर्वाधिक प्रतिष्ठित औषध कंपनी म्हणून १९६८पासून कार्यरत असणाऱ्या व ३०२९.५ कोटी रुपये महसूल असणाऱ्या ल्युपिन कंपनीची निवड झाली आहे.
Post views: counter

Current Affairs August 2016 part - 2


#eMPSCkatta_Current_Affairs

🔹इराणच्या अणू शास्त्रज्ञाला दिली गुप्तरीत्या फाशी ?

हेरगिरी करणारा इराणचा अणू शास्त्रज्ञ शहराम अमिरी याचा गुप्तरीत्या मृत्यू झाला आहे. अमेरिकेच्या गुप्तचर विभागाने 2010मध्ये हेरगिरी करताना त्याला अटक केले होते. त्यानंतर त्याला इराणला परत पाठविण्यात आले. त्यानंतर तो रहस्यमयरीत्या गायब झाला होता. बीबीसीनं दिलेल्या वृत्तानुसार, अमिरी याला याच आठवड्यात गुप्तरीत्या फाशी दिली गेली आहे.
अमिरीच्या मृतदेहाच्या गळ्याला फास लावल्याचा खुणा होत्या. त्यामुळे त्याला फाशी देण्यात आली असावी, अशी माहिती त्याच्या आईनं दिली आहे. अमिरीचा 1977मध्ये जन्म झाला होता. त्यानंतर 2009साली गेलेल्या मक्का यात्रेत तो बेपत्ता झाला होता. तो इराणमधला नावाजलेला अणू शास्त्रज्ञ होता.
अमेरिकेच्या गुप्तचर विभागानं अटक केल्यानंतर त्यासंदर्भात एक व्हिडीओही व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओमध्ये त्याला एका निर्जनस्थळी ठेवले असून, भूल देणारनं इंजेक्शन दिल्याचं त्यानं सांगितले होते.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹NSG साठी पाठिंबा देण्यास नकार देणा-या चीनला हवी आहे भारताची मदत

न्यूक्लियर सप्लायर ग्रुप (एनएसजी) देशांच्या गटात भारताच्या समावेशाला आव्हान देणा-या चीनने दक्षिण चीन समुद्राचा मालकी हक्क मिळवण्यासाठी भारताची मदत मागितली आहे. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी तीन दिवसांच्या भारत दौ-यावर येत आहेत. 12 ऑगस्टपासून त्यांच्या दौ-याला सुरुवात होणार आहे. या दौ-यात वांग यी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार असून जी20 बैठकीत भारताने दक्षिण चीन समुद्राचा मुद्दा उचलू नये यासाठी प्रयत्न करणार आहे. भारताने आपल्या बाजूने उभे राहावे अशी चीनची अपेक्षा आहे.

दक्षिण चीन समुद्रावर चीनने केलेला मालकी हक्काचा दावा अयोग्य असून त्याला कायदेशीर व ऐतिहासिक आधार नाही, असा निकाल द हेग येथील आंतरराष्ट्रीय लवादाने दिला होता. फिलिपिन्सने दाखल केलेल्या या खटल्यावरील निकाल जाहीर होताच चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग आणि चिनी परराष्ट्र मंत्रालयाने तो मान्य करण्यास साफ नकार दिला. आंतरराष्ट्रीय लवाद बेकायदेशीर असून दक्षिण चीन समुद्रातील वाद हा त्याच्या अधिकार कक्षेतील विषय नाही, असे चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग आणि चिनी परराष्ट्र मंत्रालय यांच्या वतीने सांगण्यात आले होते.

आंतरराष्ट्रीय लवादाने दिलेल्या या निकालानंतर अमेरिकेसह अनेक देश हा मुद्दा उचलून धरतील याची चीनला भीती वाटत आहे.

चीनने १९४७ साली प्रसिद्ध केलेल्या नकाशांमध्ये सर्वप्रथम ‘नाइन डॅश लाइन’ नावाने साधारण अर्धगोलाकार सीमा आखून दक्षिण चीन समुद्राच्या ९० टक्क्यांहून अधिक भागावर आपल्या मालकी हक्काचा दावा केला. शेकडो वर्षांपूर्वी चीनच्या सम्राटांनी या भागातील बेटांचा शोध लावला आणि तेथे पूर्वापार चीनचे मच्छीमार व्यापार करीत आहेत. त्यामुळे तो भाग आपलाच आहे, असा चीनचा दावा आहे. त्याला शेजारील फिलिपिन्स, व्हिएतनाम, मलेशिया, इंडोनेशिया, तैवान, ब्रुनेई आदी देशांचा विरोध असून या सर्व देशांनीही या प्रदेशावर आपापल्या मालकी हक्काचा दावा केला आहे.

गेल्या काही वर्षांत चीनने अन्य सर्व देशांचे दावे धुडकावून संपूर्ण दक्षिण चीन समुद्रावर आपला हक्क सांगितला आहे. तसेच तेथे भराव टाकून कृत्रिम बेटे तयार करण्याचा सपाटा लावला आहे. जानेवारी २०१३ मध्ये चीनच्या नौदलाने फिलिपिन्सच्या लुझॉन बेटांजवळील स्कारबरो शोल नावाने ओळखल्या जाणाऱ्या बहुतांशी पाण्याखाली असलेल्या खडकाळ बेटांच्या रांगेचा जबरदस्तीने ताबा घेतला. तत्पूर्वी दोन्ही देशांत १७ वर्षे वाटाघाटी सुरू होत्या. पण त्यातून मार्ग न निघाल्याने फिलिपिन्सने २०१३ साली हा प्रश्न द हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात नेला होता. त्यावर सुनावणी होऊन मंगळवारी निकाल देण्यात आला. तो चीनने धुडकावल्याने हा प्रश्न चिघळण्याची शक्यता आहे. अमेरिका, जपान आणि अन्य देशांनी या प्रदेशात चीनच्या अरेरावीला उत्तर देण्यासाठी आघाडी उघडली असून नौदलाच्या हालचाली वाढवल्या आहेत.