#eMPSCkatta_Current_Affairs
🔹द्राक्षांच्या " अर्ली' छाटणीचे तयार झालेत मणी
नाशिक - चिलीच्या द्राक्षांच्याअगोदर जगाच्या बाजारपेठेत द्राक्षे पोचावीत म्हणून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ऑक्टोबरच्या अगोदर छाटणीचे तंत्र विकसित केले आहे . त्यानुसार सटाणा, मालेगाव भागात छाटलेल्या बागांमध्ये सात ते आठ मिलिमीटर आकाराचे मणी तयार झाले आहेत. उरलेल्या भागामध्ये पुढील आठवड्यात " अर्ली' छाटणीला वेग येणार आहे . एकूण दीड लाख एकरांपैकी वीस टक्के क्षेत्रावर "अर्ली ' छाटणी केली जाते.
द्राक्षांच्या मालकाडी तयार करण्यासाठी एप्रिलमध्ये शेतकऱ्यांनी छाटणी केली होती . नेमक्या याच काळात बागांसाठी पाणी कमी पडले . त्यामुळे बागेतील काड्यांचा आकार बारीक राहिला आहे . त्यामुळे " अर्ली ' छाटणीतून पुरेसे मणी तयार होतील काय? अन् मणी तयार झाले तरीही ते टिकाव धरतील काय? या प्रश्नांची काळजी शेतकऱ्यांमध्ये दाटून आली आहे . गेल्या वर्षी एकूण उत्पन्नाच्या सर्वसाधारणपणे दहा टक्क्यांपर्यंत द्राक्षांची निर्यात शेतकऱ्यांनी पोचवली आहे . नाशिकची " अर्ली ' छाटणीची द्राक्षे मलेशिया, सिंगापूर, हॉंगकॉंग , थायलंड , अरब देशांमध्ये पाठवली जातात.
ऑक्टोबर छाटणीची द्राक्षे युरोप , अरब देशांप्रमाणेच लंडन , चीन , रशियामध्ये निर्यात करण्यात येतात . जानेवारीपासून निर्यातीला वेग येतो . " अर्ली ' छाटणीमध्ये प्रामुख्याने काळ्या रंगाच्या आणि हिरव्या रंगाच्या थॉमसन वाणाच्या द्राक्षांच्या बागांचा समावेश मोठ्या प्रमाणात असतो.
बाजारपेठ विस्तारण्याची अपेक्षा
जगाच्या बाजारपेठेत दक्षिण आफ्रिकेतील द्राक्षांचा हंगाम संपत असतानाच चिली आणि भारतातील द्राक्षे पोचत असत . त्यामुळे भारतीय शेतकऱ्यांना स्पर्धा करणे कठीण बनले होते . त्यावर उपाय म्हणून शेतकऱ्यांनी स्वतः शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली " अर्ली ' छाटणीचे तंत्र विकसित केले आहे . प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा दर्जेदार द्राक्षांचे उत्पादन घेण्यात शेतकरी पारंगत झाले आहेत. आता शेतकऱ्यांना बाजारपेठ आणखी विस्तारित होण्याची अपेक्षा आहे . अमेरिका , ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड , जपानची बाजारपेठ उपलब्ध झाल्यास चार पैसे आणखी मिळण्यास मदत होईल , अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे . द्राक्ष बागायतदार संघाचे माजी अध्यक्ष अशोक गायकवाड यांनी "ऍपेडा ' कडे विस्तारित बाजारपेठेविषयीच्या मागण्या करण्यात आल्याची माहिती दिली .
#eMPSCkatta_Current_Affairs
🔹भारतातील कुपोषणाची समस्या अद्याप गंभीर
कोलकाता - भारतातील कुपोषणाची भयावहता कमी झाली असली तरी दक्षिण आशियाई देशांशी तुलना करता अद्याप पोषणाबाबतची स्थिती समाधानकारक नाही , असे मत वरिष्ठ आहार रोगनिदान तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे .
" नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन' (एनआयएन ), " कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च ' या संस्थांचे माजी संचालक डॉ . बी. शशिकरण म्हणाले , "" भारतातील काही भाग वगळता कुपोषणाच्या स्थितीत निश्चितच सुधारणा झाली आहे . अपुऱ्या आहारामुळे खुरटेपणा व वजन