Exam Guidance लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Exam Guidance लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Post views: counter

राज्यव्यवस्था घटकाची तयारी कशी करावी ?


                                          स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासात पॉलिटी हा घटक अतिशय महत्त्वाचा मनाला जातो. याची कारणमीमांसा अनेक प्रकारे करता येईल. पहिले कारण म्हणजे, प्रशासक म्हणून कार्यरत झाल्यावर ज्या संवैधानिक चौकटीमध्ये काम करायचे आहे, त्या व्यवस्थेची तोंडओळख 'पॉलिटी'च्या अभ्यासामधून होते. दुसरे कारण म्हणजे, राज्यव्यवस्थेच्या (पॉलिटी) अभ्यासामुळे चालू घडामोडींचे विश्लेषण करणे सोपे पडते. तिसरे कारण म्हणजे, हा विषय सामान्य अध्ययन पेपर क्र. २ (मुख्य परीक्षा), निबंधाचा पेपर तसेच मुलाखतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरतो. तात्पर्य, 'इंडियन पॉलिटी' या घटकाचा सखोल अभ्यास व चिंतन यूपीएससीसाठी (व अन्य स्पर्धा परीक्षांसाठीही) अपरिहार्य ठरते.

स्पर्धापरीक्षांचे प्रांगण!


                               मुळात या परीक्षांचा हेतू प्रशासकीय कार्यासाठी चांगल्या लोकांची निवड करणे हा आहे. गुणवत्ता ही कोणाची मक्तेदारी नव्हे, ती जनतेत विखुरली असते. स्पर्धापरीक्षांद्वारे सामान्यांना आपले कौशल्य दाखवण्याची संधी असते. अगदी प्राचीन मौर्य साम्राज्यात अशा प्रकारे परीक्षा घेऊन अधिकारी निवडत. चीनमध्ये तर शतकानुशतके अशी परीक्षा देऊन सामान्यांनी असामान्य कामगिरी केली. चीनमधील अशा प्रशासकांना 'मॅडरीन' असे म्हणतात. आपल्याकडे आपण 'नोकरशाही' (Bureaucracy) असे म्हणतो.
Post views: counter

CSAT – मूलभूत संख्याज्ञान आणि बुद्धिमत्ता चाचणी

                  या लेखात आपण मूलभूत संख्याज्ञान आणि बुद्धिमत्ता चाचणी या घटकाची चर्चा करणार आहोत. या घटकामध्ये नावाप्रमाणेच मूलभूत संख्याज्ञान व बुद्धिमत्ता चाचणी हे दोन उपघटक आहेत. तयारीला सुरुवात करण्याआधी या दोन उपघटकांतील फरक लक्षात घेणे गरजेचे आहे. मूलभूत संख्याज्ञान म्हणजे आपली संख्याची व त्यावरील केल्या जाणाऱ्या क्रियांशी असलेली ओळख. जसे की, बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार इत्यादी. याचप्रमाणे वरीलपकी एकापेक्षा अधिक क्रिया करायला लागणारी पदावली दिली असल्यास कोणत्या क्रमाने क्रिया केल्या जातात हे उमेदवाराला माहीत आहे का, अशा प्रकारच्या

GS- 4 syllabus

पेपर-४मध्ये अर्थव्यवस्था, कृषी व विज्ञान आणि तंत्रज्ञान अशा तीन विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे. अभ्यासाच्या सुविधेसाठी या पेपरच्या अभ्यासक्रमाची विभागणी कशा प्रकारे करता येईल याची चर्चा या व पुढील लेखांमध्ये करूयात. 
  • भारतीय अर्थव्यवस्था: भारतीय अर्थव्यवस्थेमधील आव्हाने- गरिबी, बेरोजगारी व प्रादेशिक असमतोल, नियोजन- प्रक्रिया प्रकार, भारताच्या पहिल्या ते दहाव्या पंचवार्षकि योजनांचा आढावा व मूल्यमापन, विकासाचे सामाजिक व आíथक निदर्शक, राज्य व स्थानिक स्तरावरील नियोजन, विकेंद्रीकरण- संविधानातील ७३वी व ७४वी सुधारणा.
  • समष्टी अर्थशास्त्र: राष्ट्रीय उत्पन्न लेखांकनाच्या पद्धती- पशांचे कार्य-आधार पसा- जननक्षम पसा- पशाचा संख्या सिद्धांत- पसा गुणक, चलनवाढीचे पशाविषयक व पशाव्यतिरिक्त सिद्धांत- चलनवाढ नियंत्रण- चलनविषयक, आíथक आणि थेट उपाययोजना.

अर्थव्यवस्थेचा अभ्यास कसा करावा ?


                   अभ्यासाच्या दृष्टीने पेपर- ४ ची पारंपरिक अर्थव्यवस्था, गतिमान अर्थव्यवस्था, कृषी आणि विज्ञान व तंत्रज्ञान अशा चार भागांत विभागणी करता येईल. अर्थव्यवस्था हा विषय बहुतांश विद्यार्थ्यांना मोठमोठे आकडे व तांत्रिक संज्ञांचा वापर यामुळे अवघड वाटतो. या विषयाचे समज-गरसमज व न्यूनगंड दूर करून आत्मविश्वासाने या विषयाची तयारी करण्यासाठी अभ्यासाची नेमकी पद्धत पाहू या. 
Post views: counter

आर्थिक घडामोडीचा अभ्यास कसा करावा ?


         संकल्पनात्मक अभ्यासाइतकेच अर्थव्यवस्था या घटकात चालू घडामोडींना महत्त्व आहे. किंबहुना संकल्पनांच्या आधारे चालू घडामोडींचा अभ्यास करत या विषयाच्या अभ्यासाचा मूलभूत पाया पक्का करता येतो. चालू घडामोडींमुळे हा विषय नेहमीच गतिमान व अद्ययावत राहतो. त्यामुळे राज्य व आंतरराष्ट्रीय स्तरावर घडणाऱ्या अर्थविषयक घडामोडी, प्रकाशित होणारे अहवाल अभ्यासणे हे अर्थव्यवस्था विषयाच्या परिपूर्ण तयारीसाठी आवश्यक आहे. या बाबतीत कुठल्या मुद्दय़ांवर भर द्यावा, ते पाहूयात. 

भारतीय कृषिव्यवस्था, ग्रामविकास व सहकार



                पेपर ४ मधील कृषीविषयक घटकांचा अभ्यास अर्थव्यवस्थेचा भाग म्हणून करणे आयोगाला अपेक्षित आहे. त्यामुळे कृषी क्षेत्राचे आर्थिक पैलू या पेपरच्या तयारीसाठी अभ्यासणे आवश्यक आहे. अभ्यासाच्या सोयीसाठी अभ्यासक्रमाची विभागणी कशा प्रकारे करावी हे आपण मागच्या लेखामध्ये पाहिले. आज आपण अभ्यास कसा करावा याची चर्चा करुयात.
कृषी क्षेत्राचे भारतीय अर्थव्यवस्थेतील महत्त्व समजून घेण्यासाठी पाहणी अहवालातून GDP, GNP रोजगार आयात-निर्यात यातील कृषी क्षेत्राचा वाटा (टक्केवारी) पाहायला हवा. याबाबत उद्योग व सेवा क्षेत्राशी कृषी क्षेत्राची तुलना लक्षात घ्यावी. कृषी व इतर क्षेत्रांचा आंतरसंबंध पाहताना कृषी आधारित व संलग्न उद्योगांचे स्वरूप, समस्या, कारणे, उपाय, महत्त्व या बाबींचा आढावा घ्यावा.
                वेगवेगळ्या पंचवार्षकि योजनांमध्ये कृषिविकासासाठी ठरविण्यात आलेली धोरणे व योजनांचा थोडक्यात आढावा घ्यावा आणि त्यांचे यशापयश लक्षात घ्यावे. १०व्या, ११व्या व १२व्या पंचवार्षकि योजनांमधील कृषीविषयक
Post views: counter

विज्ञान व तंत्रज्ञान विकास या घटकाची तयारी कशी करावी ?


               अर्थव्यवस्थेच्या विकासाचा विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासाशी जवळून संबंध असल्याने ‘विज्ञान-तंत्रज्ञान’ हा घटक अर्थशास्त्राशी संबंधित एमपीएससीच्या मुख्य परीक्षेच्या पेपर ४ मध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. या घटकाची तयारी कशी करावी, याविषयी..
अर्थव्यवस्थेचा विकास हा बव्हंशी विज्ञान व तंत्रज्ञानाच्या विकासावर अवलंबून असतो. उमेदवारांनी पूर्व परीक्षेसाठी ‘सामान्य विज्ञान’ समजून घ्यायला हवे. मुख्य परीक्षेसाठी सामान्य विज्ञान विषयाचे उपयोजन म्हणजेच तंत्रज्ञान हे वेगवेगळ्या ‘आíथक’ बाबींशी संबंध जोडून अभ्यासायला हवे अशी आयोगाची अपेक्षा आहे. मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम पाहिल्यानंतर लक्षात येते की, तंत्रज्ञान व त्याचा मानवी कल्याणासाठी उपयोग या अनुषंगाने सर्व घटक अभ्यासणे आयोगाला अभिप्रेत आहे. या घटकाचा पद्धतशीर अभ्यास कशा प्रकारे करायचा ते पाहू या.

मराठी व इंग्रजीचा अभ्यास कसा करावा ?

              उमेदवाराची आकलनक्षमता अभिवृत्ती, विचार-प्रक्रिया, उमेदवाराची अभिव्यक्ती, लेखन आणि संवादाचे कौशल्य या गोष्टी जोखण्यासाठी इंग्रजी व मराठी या दोन अनिवार्य भाषाविषयांच्या प्रश्नपत्रिकांचा समावेश एमपीएससी- मुख्य परीक्षेत करण्यात आला आहेत. अनिवार्य इंग्रजी व मराठी विषय १०० गुणांसाठी आणि बारावीच्या परीक्षेच्या समकक्ष असेल व प्रश्नांचे स्वरूप पारंपरिक असेल असे आयोगाने अभ्यासक्रमात नमूद केले आहे. या विषयांच्या तयारीची व प्रश्नपत्रिका सोडवण्याची रणनीती अभ्यासूया.
व्याकरण : हा विभाग पकीच्या पकी गुण मिळवून देणारा     आहे. त्यामुळे व्याकरणावर पकड मजबूत असायला हवी. नियम समजून घेणे व सराव करणे दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत.
लेखन :कार्यालयीन/औपचारिक पत्रांसाठीची ‘रचना’ पक्की लक्षात असायला हवी. या पत्रांची भाषा औपचारिक असणे व मुद्देसूदपणे म्हणणे मांडणे आवश्यक आहे.
Post views: counter

CSAT: तार्किक अनुमान आणि विश्लेषणात्मक चाचणी

या  लेखामध्ये आपण तार्किक अनुमान आणि विश्लेषणात्मक चाचणी (Logical Reasoning and Analytical Ability) या घटकाचा विचार करणार आहोत.
या घटकामध्ये संपूर्णपणे तर्कशास्त्रावर आधारित तसेच काही गणितीय संकल्पना व तर्कशास्त्र यावर आधारित प्रश्न विचारले जाऊ शकतात. या घटकाचे वैशिष्टय़ म्हणजे- प्रश्नप्रकारांची विविधता. अशा सर्व प्रश्नप्रकारांमधून प्रशासकीय सेवेत आवश्यक असणारी कोणती कौशल्ये तपासली जातात, हा प्रश्न काही जणांना पडू शकतो. परंतु, आपण हे लक्षात घ्यायला हवे की, या सर्व घटकांचे आणि त्यात अंतर्भूत असलेल्या कौशल्यांचे आपल्या निर्णयप्रक्रियेत महत्त्वाचे स्थान आहे. निर्णयप्रकियेमध्ये अशा प्रकारची तार्किक अनुमाने व परिस्थितीचे विश्लेषण करण्याची हातोटी हे कळीचे मुद्दे आहेत. या घटकांतील सर्व प्रश्न प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे उमेदवाराचे हे कौशल्य तपासून बघत असतात, तसेच प्रशासकीय कामांमध्ये अतिशय गरजेची असलेली वस्तुनिष्ठता
Post views: counter

How To Train Your Mind For Mental Stress During Exam?

राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा पेपर कसा सोडवायचा?

                                    पूर्व परीक्षा ही बहूत्तरिय स्वरुपाची असते, म्हणजे एका प्रश्नाचे ४ उत्तर दिलेले असतात त्यापैकी सर्वात बरोबर उत्तर कोणत आहे ते अचूक निवडायचे असते. ह्यासाठी स्पीड आणि अचूकता ही महत्वाची असते. पेपर सोडवतांना प्रेझेन्स ऑफ माइंड असावे लागते म्हणजे उत्तर निवडताना कोणत उत्तर बरोबर नाही हे कळायला पाहिजे कारण त्यासाठी आपला कॉमन सेन्स वापरायचा असतो. हे ज्याला जमलं तोच जास्तीत जास्त गुण मिळवू शकतो पूर्वपरीक्षेत.
                                   सर्वात आधी मोडेल टेस्ट पेपर्स सोडवायची खूप प्रक्टिस करावी. त्यासाठी, १० ते ३० हजार प्रश्न असलेली पुस्तके घ्यावीत आणि त्यामधील प्रश्न पत्रिका २ तासात सोडवायची प्रक्टिस करावी. प्रक्टीसनेच परफेक्ट व्हाल आणि चुकीचे उत्तर देणे कमी होईल व निगेटिव्ह मार्किंग्च्या प्रश्नातून तुमची सुटका होईल. परीक्षेच्या वेळी एखादा प्रश्न कठीण वाटत असेल

UPSC Or MPSC?


                                   आपण काल नुकत्याच लागलेल्या यूपीएससी निकालाच्या काही पैलूंची चर्चा केली. त्या निकालातून कशा प्रकारे यशासाठी प्रेरणा घेता येईल ते आज आपण पाहू.यूपीएससीतील यशस्वी उमेदवारांपैकी अनेक जण आधीच कुठल्या ना कुठल्या सरकारी नोकरीत आहेत. विशेषत: असे दिसते की राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन यशस्वी झालेले उमेदवार यंदाच्या यादीतही आहेत. काही उदाहरणेच बघायची तर धीरज सोनजे, मुकुल कुलकर्णी, सायली ढोले, सचिन घागरे या सर्वांची आधीच राज्यात उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झालेली आहे. त्यांनीच आता यूपीएससीत यश मिळवले आहे. गेल्या वर्षीच्या रमेश घोलप याचे उदाहरण पाहण्यासारखे आहे. तो एमपीएससी परीक्षेत राज्यात पहिला आला व त्याच वर्षी यूपीएससी परीक्षेत त्याची आयएएस पदावर निवड झाली.या सर्व चर्चेचा सारांश असा की यूपीएससी करायचे की एमपीएससी हा प्रश्न अनेक उमेदवारांना पडतो, पण त्या प्रश्नाने गोंधळून जायची गरज नाही. दोन्ही परीक्षा आता एकमेकांना समांतरच आहेत. एकाच वेळी दोन्ही देता येतात व दोन्हीमध्ये एकाचवेळी यश मिळवता येते. पहिल्याच प्रयत्नात यश मिळू शकते, असेही आपण यंदाच्या निकालाकडे बघून म्हणू शकतो. उदा. सायली ढोले हिने पहिल्याच प्रयत्नात राज्यसेवा देऊन उपजिल्हाधिकारी
Post views: counter

मी स्पर्धा परीक्षा देऊ का?

● मी स्पर्धा परीक्षा देऊ का ?
  • स्पर्धा परीक्षा देऊ का? 
  • कुठवर अॅटॅम्प्ट करतच राहू?


                                             आयुष्याचं ध्येय निश्चित असेल तर प्रयत्न करायलाही धार येते. आणि प्रयत्न टोकदार असतील तर यशही मिळतंच!स्पर्धा परीक्षांच्या बाबतीत हे तंतोतंतलागू होतं. अनेकांना वाटतं आपल्याला अमुकक्षेत्रत करिअरला संधी नाही, आपल्याला तमुक जमणार नाही तर मग स्पर्धा परीक्षा द्यायला काय हरकत आहे. त्यांना हरकत नसेल पण माझी मोठी हरकत आहे. आपल्याला काहीच येत नाही, काहीच जमत नाही, निदान स्पर्धा परीक्षा तरी देऊच असं म्हणत, या परीक्षांकडे वळू नका. कारण तसं केलं तर पुढे यशाची वाट सापडणं अशक्यच!आपण स्पर्धा परीक्षा का द्यायच्या, याचं उत्तर आधी स्वत:कडे तयार ठेवा!

  • मला कशातच रस नाही, काहीच जमत नाही, आता नोकरीसाठी स्पर्धा परीक्षा देऊन पहाव्यात असं वाटतं? 
  • देता येतील का? 
  • या स्पर्धा परीक्षेला कुणीही बसलं तर चालतं का?  


                            आपल्याला काहीच जमत नाही म्हणून स्पर्धा परीक्षा देऊ असं म्हणत अत्यंत नकारात्मक दृष्टिकोनातून स्पर्धा परीक्षांकडे मुळीच वळू नये. स्पर्धा परीक्षाच काय खरं तर एकूणच
Post views: counter

How to prepare for Indian Polity ?

भारतीय‬ राज्यघटनेचा अभ्यास कसा करावा?
                           भारतातील घटकराज्यांच्या निर्मितीपासून त्यांच्या विकासाबाबत, नागरिकांमधील परस्परसंबंधापासून इतर देशांबरोबरच्या धोरण, क्षेपणास्त्रांपर्यंतच्या निर्मितीबाबत, महिलांपासून अर्थव्यवस्थेपर्यंत आणि शेतीपाण्यापासून सणांसाठीच्या सुट्यांपर्यंत, अनेक नव्हे, प्रत्येक बाब नियमित होते ती इथल्या प्रस्थापित ‘राज्यव्यवस्थे’कडून. ही भारतीय राज्यव्यवस्था उभी आहे जगातील सर्वात विस्तृत लिखित राज्यघटनेच्या पायावर. साहजिकच भारतात घडणा-या व भारताबाबत घडणा-या प्रत्येक घडामोडीबाबत विद्यार्थ्याने राज्यशास्त्राच्या अंगाने/बाजूने अभ्यास करायलाच हवा. घडलेली महत्त्वाची घटना, निर्णय, धोरणे इ. सगळ्या गोष्टी ‘राज्यघटने’च्या निकषातून तपासणे आणि त्यासाठी राज्यघटनेचा बारकाईने अभ्यास करणे हा या घटकविषयाच्या तयारीचा गाभा.
                         राज्यघटनेचा अभ्यास करणे म्हणजे क्लिष्ट भाषेत लिहिलेली सगळी कलमे पाठ करणे नव्हे. घटनेतील काही भाग अत्यंत महत्त्वाचे, काही भाग महत्त्वाचे, तर काही भाग इतरांच्या मानाने कमी महत्त्वाचे आहेत. भारतामध्ये ‘लोकशाही’ असल्याने लोकांवर अर्थात सामान्य जनतेच्या जीवनावर प्रत्यक्ष परिणाम करणरे भाग यूपीएससीच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचे असतात. यामध्ये मूलभूत अधिकार,
Post views: counter

MPSC अभ्यासाचे मुलभूत सिद्धांत जाणा...


सुरुवातीला अभ्यासक्रमाच्या सर्व विषयातील मुलभूत संकल्पना जाणून घ्या.
  1. अभ्यास क्रमातील घटकांना समकालीन घटना / घडामोडींचा जोडण्याची हातोटी विकसित करा.
  2. मोजक्या कालावधीत प्रचंड अभ्यास करू नका, तर निर्धारित कालावधीत नियमित व सातत्यपूर्ण अभ्यास करा.
  3. विशेषीकृत अभ्यास बाजूला सारून निरीक्षणात्मक अभ्यास पद्धत स्विकारा.
  4. नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी केवळ एकाच विषयाचे विशेतज्ञ असण्याचा काळ इतिहासजमा झाला आहे. त्यामुळे ही परीक्षा उत्तीर्ण होऊ इच्छीना-यांनी बहुश्रुत असण्यासोबतच विश्लेषणात्मक आणि कार्यकारणभावाची मनोवृत्ती विकसित करावी.
  5. सध्याच्या परीक्षेच्या स्वरुपात आंतरविद्याशाखीय आणि गतिशील झाले असल्याने या परीक्षेची तयारी करणाऱ्याकडे केवळ माहितीचा साठा उपयोगी नाही, विश्लेषणात्मक आणि कार्यकारणभाव सुसंगत असणे गरजेचे असल्याची बाब लक्षात ठेवा.

भारतीय राज्यघटना व राजकीय व्यवस्थेची तयार कशी करावी ?


                     राज्यव्यवस्थेवर दरवर्षी साधारणत: ८ ते १० गुणांसाठी प्रश्न विचारले जातात. वस्तुत: हा घटक राज्यसेवेची परीक्षा पात्र होऊन शासकीय अधिकारी बनू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी परिचयाचा असतो. कारण राज्यघटना व राज्यव्यवस्थेसंबंधी कुतूहल असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये याविषयी जाणून घेण्याची इच्छा निर्माण होते आणि विद्यार्थी लोकसेवा आयोगाच्या परीक्षांकडे आकर्षति होतो.स्वाभाविकच विद्यार्थी भारतीय राज्यव्यवस्थेचा पाया असलेली राज्यघटना नेमकी कशा स्वरूपाची आहे? राज्यघटनेत नेमके काय अंतर्भूत आहे? घटनेत सार्वजनिक प्रशासनासंबंधी नेमक्या कोणत्या तरतुदी आहेत? यापासून ते राज्यघटनेचा प्रत्यक्ष व्यवहार कसा झाला? त्या व्यवहाराची सद्य:स्थिती काय आहे? आणि भवितव्य काय? अशा आव्हानात्मक प्रश्नांची उत्तरे शोधू लागतो. त्यातूनच विद्यार्थ्यांचे या घटकाचे अकलन वाढते. एकाअर्थी स्पर्धा परीक्षार्थीसाठी हा घटक जिव्हाळय़ाचा ठरतो. परिणामी पकीच्या पकी गुण प्राप्त करून देणारा घटक म्हणून याचा विचार करता येतो. किंबहुना प्रत्येक परीक्षार्थीने यादृष्टीनेच याचा विचार करावा.
                    महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यघटना व राज्यव्यवस्था या घटकाचा अभ्यासक्रम सविस्तरपणे नमूद केला आहे. यात भारतीय राज्यघटनेचा उगम, निर्मिती, स्वरूप व वैशिष्टय़े; मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे व मूलभूत कर्तव्ये; केंद्रीय कार्यकारी मंडळ व कायदेमंडळ; राज्य कार्यकारी मंडळ व कायदेमंडळ; न्यायव्यवस्था; महत्त्वाची घटनात्मक पदे आणि निवडणूक प्रक्रिया, राजकीय पक्ष व दबावगट या प्रमुख
Post views: counter

स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासाचा अभ्यास कसा करावा ?

                        राज्य सेवा मुख्य परीक्षेत इतिहास घटकाची तयारी करताना भारताचा- विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास अभ्यासणे आवश्यक आहे.  राज्य सेवा मुख्य परीक्षेच्या सामान्य अध्ययन पेपर-१ मधील इतिहास या विषय घटकाच्या अभ्यासाविषयी या लेखात चर्चा करू.

                        ब्रिटिश सत्तेची भारतामध्ये स्थापना या मुद्दय़ाच्या अनुषंगाने प्रमुख भारतीय सत्तांविरूद्ध युद्धे, तनाती फौज धोरण, खालसा धोरण, १८५७ पर्यंतची ब्रिटिश राज्याची रचना हा पूर्णपणे तथ्यात्मक भाग असून याचा तक्त्यांच्या स्वरूपात अभ्यास करणे सोयीचे ठरेल. आधुनिक भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास (१८१८ ते १८५७) अभ्यासताना वृत्तपत्रे, रेल्वे, टपाल व तार, उदय़ोगधंदे, जमीन सुधारणा व सामाजिक-धार्मिक सुधारणा यांचा समाजावरील परिणाम हे घटक अभ्यासताना या विषयीच्या बाबी कालक्रमाने लक्षात घ्याव्यात. १८१८ ते १८५७ व त्यानंतर काँग्रेसच्या कालखंडामध्ये या मुद्दय़ांची भूमिका, महत्त्व काय होते याचा अभ्यास करावा.
सामाजिक, सांस्कृतिक बदलांचा अभ्यास करताना ख्रिश्चन मिशनबरोबरचे संबंध, इंग्रजी शिक्षण व मुद्रणालयाचे आगमन, अधिकृत सामाजिक सुधारणांचे उपाय (१८२८ ते १८५७), सामाजिक-धार्मिक सुधारणांच्या चळवळी जसे- ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, आर्य समाज, शीख तसेच मुस्लीम धर्मीयांतील सुधारणा चळवळी, अस्पृश्यतेच्या निर्मूलनासाठी सुरू करण्यात आलेले डिप्रेस्ड क्लासेस मिशन, ब्राह्मणेतर चळवळ व जस्टिस पार्टी यांचा अभ्यास आवश्यक आहे. सत्यशोधक समाज, अस्पृश्यता निर्मूलनासाठी चळवळी इत्यादींचा अभ्यास करतेवेळी गांधी युगातील त्यांच्या वाटचालींचा अभ्यास जास्त बारकाईने व सविस्तर करणे आवश्यक  आहे.

इतिहास घटकविषयाचा तार्किक अभ्यास

                                   इतिहास हा समाज समजून घेण्याचा एक दृष्टिकोन आहे. त्यामुळे या विषयाचा तार्किक अभ्यास सोपा आणि परिणामकारक ठरतो. कालानुक्रमाची जंत्री पाठ करण्यापेक्षा अधिक स्वारस्यपूर्ण असं बरंच काही या विषयात आहे, हे लक्षात घ्यायला हवं.

                                   प्रशासनात काम करताना अधिकारी हे कल्याणकारी राज्याचे प्रतिनिधित्व करत असतात. नफ्या-तोटय़ाच्या तराजूपेक्षा जनतेच्या 'कल्याणा'चे मापदंड इथे जास्त महत्त्वाचे ठरतात. हे कल्याणकारी कामाचे मापदंड समाजाची रचना, वैशिष्टय़े आणि इतिहास यांच्या आधारे ठरवले जातात. त्यामुळेच स्पर्धापरीक्षांच्या अभ्यासक्रमामध्ये 'इतिहास' हा घटक निरपवादपणे समाविष्ट असतो. 'इतिहासा'च्या समावेशाचे हे कारण लक्षात घेतले तर कालानुक्रमाची जंत्री पाठ करण्यापेक्षा  स्वारस्यपूर्ण अशा अनेक गोष्टी या विषयात आहे, हे लक्षात येईल. 'इतिहास' हा समाज समजून घेण्याचा एक दृष्टिकोन आहे. त्यामुळे या विषयाचा तार्किक अभ्यास सोपा आणि परिणामकारक ठरतो, हे लक्षात घ्यायला हवे.
                                  मुख्य परीक्षेमध्ये आधुनिक भारत व महाराष्ट्राचा इतिहास अभ्यासणे आयोगाला अभिप्रेत आहे. हा पूर्ण भाग पूर्वपरीक्षेतही असल्याने एकत्रितपणे अभ्यास वेळेच्या बचतीसाठी आवश्यक आहे. प्राचीन व मध्ययुगीन इतिहासाच्या अभ्यासाची रणनीती आपण पूर्वपरीक्षेच्या विभागात सविस्तरपणे पाहिली आहे. आधुनिक इतिहासाच्या तयारीसाठीची पद्धत या प्रकारामध्ये पाहू या.
Post views: counter

पूर्वपरीक्षेची रणनीती....

                       परीक्षेच्या या अंतिम टप्प्यात प्रश्नपत्रिका सोडवण्याची रणनीती कशी असावी याविषयीचे कानमंत्र.
बहुतेक वेळा परीक्षा हॉलच्या बाहेर आल्यानंतर उमेदवारांच्या लक्षात येते की, आपण अभ्यासलेले, माहीत असलेले, सोपे प्रश्न सोडवण्यात चुका केल्या आहेत. साधे-सोपे प्रश्न निसटले कसे याचे उत्तर सापडत नाही आणि हात डोक्यावर मारून घेण्याशिवाय पर्याय उरत नाही. अशा चुका होतात प्रामुख्याने तीन कारणांनी. पहिले म्हणजे परीक्षा हॉलमध्ये वेळेच्या ताणाचे व्यवस्थापन करण्यात आपण कमी पडतो आणि वेळेच्या ताणामुळे उत्तर चुकतो. दुसरे कारण म्हणजे  फाजील आत्मविश्वासामुळे पूर्वग्रहाला बळी पडतो आणि चुकतो आणि तिसरे कारण म्हणजे घाईघाईत प्रश्न वाचल्यामुळे चुकीचे उत्तर मार्क करतो. हे टाळण्यासाठी प्रत्येक प्रश्न गांभीर्यपूर्वक वाचावा. प्रश्न सोपा, माहीत असणारा असला, तरीही!

After State Service Pre Exam...

  •  पूर्वपरीक्षेनंतरचा 'शून्य काळ'
                                   राज्य सेवा पूर्वपरीक्षा झाली. पेपर काहींना ठीक गेला असेल, काहींना अवघड, तर काहींना बऱ्यापकी चांगला. पेपर संपला तरी सहसा तो उमेदवारांची पाठ सोडत नाही. येथून पुढचे काही दिवस उत्तरतालिकेची वाट पाहण्यात, बरोबर किंवा चूक उत्तरांची संख्या शोधण्यात उमेदवारांचा वेळ जाईल. असे होणे स्वाभाविक असते. पूर्वपरीक्षेनंतरचा हा 'शून्य काळ' अंदाज बांधण्यात खर्ची पडतो. तज्ज्ञ असे सुचवतात की, पूर्वपरीक्षेसाठी झोकून अभ्यास केला असेल तर पुढच्या तयारीला सज्ज होण्यापूर्वी दोन दिवसांचा आराम या शून्य काळात जरूर करावा. उत्तरे चूक की बरोबर हे शोधण्यात वेळ घालवू नका, असे कितीदा लिहिले-वाचले आणि ते पटले तरीही आपण स्वत:ला त्यापासून रोखू शकत नाही. निकालाची चिंता आणि उत्सुकता असणे स्वाभाविक आहे; पण एकदा पेपर संपला की, आपल्या हाती फक्त पुढच्या अभ्यासाचे नियोजन करणे आणि प्रत्यक्ष अभ्यास करणे एवढेच असते. पूर्वपरीक्षा आपण नक्की उत्तीर्ण होऊ असा काहींचा अंदाज असेल. काहींना आपण