- केंद्र सरकारचा "अमृत योजना‘ राबविण्याचा निर्णय
टंचाईग्रस्त शहरांसाठी शाश्वत पाणीपुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारने "अमृत योजना" राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी राज्यातील 43 शहरांचा समावेश होणार असला तरी, मुंबई, ठाण्यासारख्या शहरापेक्षा सोलापूर, लातूरसह अन्य शहरांना प्राधान्य देण्यात येणार आहे. यासाठी येत्या 20 ऑगस्टपासून केंद्र सरकारचे पथक राज्याच्या दौऱ्यावर येत असून, तीनदिवसीय कार्यशाळेनंतर शहरांची नावे निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती नगरविकास विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. राज्य सरकारची "जलयुक्त शिवार योजना" यशस्वी झाली असली तरी, ही योजना ग्रामीण भागात राबविण्यात येत आहे. 2 हजार कोटींची "अमृत योजना" राबविण्यासाठी राज्यातील 43 शहरांची निवड करण्यात आली असली तरी, पाणीटंचाईच्या शहरांचा प्राधान्याने विचार करण्यात येणार आहे.
अमृत योजनेसाठी निश्चित केलेली शहरे : मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, नाशिक, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, औरंगाबाद, नवी मुंबई, सोलापूर, मीरा-भाईंदर, भिवंडी, अमरावती, नांदेड, कोल्हापूर, इचलकरंजी, उल्हासनगर, सांगली-मिरज-कुपवाड, मालेगाव, जळगाव, अकोला, लातूर, धुळे, नगर, चंद्रपूर, परभणी, जालना, अंबरनाथ, भुसावळ, पनवेल, बदलापूर, बीड, गोंदिया, सातारा, बार्शी, यवतमाळ, अचलपूर, उस्मानाबाद, नंदुरबार, वर्धा आणि उदगीर.
अमृत योजनेसाठी निश्चित केलेली शहरे : मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, नाशिक, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, औरंगाबाद, नवी मुंबई, सोलापूर, मीरा-भाईंदर, भिवंडी, अमरावती, नांदेड, कोल्हापूर, इचलकरंजी, उल्हासनगर, सांगली-मिरज-कुपवाड, मालेगाव, जळगाव, अकोला, लातूर, धुळे, नगर, चंद्रपूर, परभणी, जालना, अंबरनाथ, भुसावळ, पनवेल, बदलापूर, बीड, गोंदिया, सातारा, बार्शी, यवतमाळ, अचलपूर, उस्मानाबाद, नंदुरबार, वर्धा आणि उदगीर.
- फेसबुक लवकरच "ब्रेकिंग न्युज" नवे ऍप सादर करणार
लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साईट फेसबुक लवकरच "ब्रेकिंग न्युज"बाबत माहिती देण्यासाठी नवे ऍप सादर करणार आहे. सध्यातरी या ऍपची चाचणी सुरु असून लवकरच ती सर्व युजर्ससाठी उपलब्ध होणार आहे.
या ऍपद्वारे फेसबुकसोबत करार असलेल्या प्रकाशकांच्या विविध महत्वाच्या बातम्या, लेख आदींबाबत युजरला सूचित करण्यात येणार आहे. तसेच सोबत
या ऍपद्वारे फेसबुकसोबत करार असलेल्या प्रकाशकांच्या विविध महत्वाच्या बातम्या, लेख आदींबाबत युजरला सूचित करण्यात येणार आहे. तसेच सोबत